शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने तीन टिप्पर पेटविले

By admin | Updated: June 23, 2017 00:18 IST

शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले.

बोरगाव येथील घटना : भरधाव टिप्परने विद्यार्थिनीला चिरडलेलोकमत न्यूज नेटवर्कपवनी/विरली/आसगाव/पालोरा : शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. ही घटना लाखांदूर-पवनी मार्गावरील बोरगाव येथे गुरूवारला दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त जमावाने रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर पेटविले. यावेळी पोलीस व्हॅन आणि अग्निशामक दलाच्या वाहनावरही जमावाने दगडफेक करून रोष व्यक्त केला.प्राची मोतीराम मांडवकर (१६) रा.मांगली (चौ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. आसगाव येथून खासगी शिकवणी वर्ग आटोपून ती आपल्या तीन मैत्रिणीसह सायकलने मांगलीला परत येत होती. दरम्यान इटान रेती घाटातून रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने (क्र.एमएच ४० वाय ९५१२) मांगली फाट्यावर तिला चिरडले. यात तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तिचा मेंदू घटनास्थळापासून २५ फूट अंतरावर जावून पडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी दुचाकीचा टिप्परचा पाठलाग करून आसगावजवळ टिप्पर अडविला. त्यानंतर संतप्त जमावाने हा टिप्पर पेटविला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी या मार्गाने रेती वाहतूक करणारे अन्य दोन टिप्पर अडवून त्यांनाही पेटविले. अपघाताची माहिती मिळताच पवनीचे ठाणेदार सुनील ताजने हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस वाहनावर दगडफेक करून रोष व्यक्त केला. यावेळी आलेले अग्निशमन दलाचेही वाहन ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडले. शेवटी पोलिसांची वाढीव कुमक मागवून संतप्त ग्रामस्थांना पांगविण्याचा प्रयत्न केला.घटनेचे गांभीर्य ओळखून पवनीचे तहसिलदार कोकार्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातामुळे लाखांदूर-पवनी मार्गावरील वाहतूक सुमारे ५ तास ठप्प होती. संतप्त ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे घटनास्थळावरून मृतदेह उचलू देण्यासाठी ग्रामस्थांनी नकार दर्शविला होता. सायंकाळी ५.३० पर्यंत घटनास्थळी तणावाची स्थिती होती. आ. रामचंद्र अवसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रूपयांचा धनादेश दिला. आणि वैयक्तिक १ लाख रूपये मदत करण्याची घोषणा आ.अवसरे यांनी केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत मृतदेह उचलण्यात आला.रेती घाट बंद करा या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेविरूद्ध तीव्र असंतोष खदखदत होता. ग्रामस्थांनी या परिसरातील इटान, इसापूर, उमरी (चौ.) हे रेती घाट बंद करावे. मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि पवनीचे तहसीलदार व ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रास्ता रोको करून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.दोन महिन्यांमध्ये पाच बळीलाखांदूर-पवनी मार्गावर रात्रंदिवस चालणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर अपघातामुळे आजवर अनेकांचा बळी गेला आहे. तुमसर तालुक्यातील चारगावसह अन्य रोतीघाटांवर रेतीची खुलेआम चोरी सुरू आहे. लिलावादरम्यान घातलेल्या अटी आणि शर्थीचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. महिनाभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील विरली (बुज) येथील सुनिता महावाडे या महिलेचा टिप्परने बळी घेतला. त्यानंतर दोन दिवसातच पवनी-अड्याळ मार्गावर लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांचा टिप्परच्या धडकेने घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसातच सिंदपुरी फाट्यावर कामाक्षीअम्मा रामसागर रा.कोंढा (कोसरा) या महिलेचा टिप्परच्या मागील चाकात दबल्या गेली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचे पती गंभीररीत्या जखमी झाले होते. आणि आज गुरूवारला प्राची मांडवकर या शाळकरी मुलीचा टिप्परने बळी घेतला. मागील दोन महिन्यात रेती वाहतुकीने याच मार्गावर चार बळी घेतले. आतातरी कुणी पुढाकार घेणार की नाही, प्रशासन जागे होणार की नाही, रेतीची ही वाहतूक आणखी किती बळी घेणार? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.