शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

खाकी वर्दीतील देवदूतांनी वाचविले पुरात अडकलेल्या शेकडोंचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून शिरले पुराच्या पाण्यातसुखरुप बाहेर निघालेल्यांचा पोलिसांना सॅल्यूट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करुनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

समाजाचा सजग प्रहरी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असे पोलिसांबाबत म्हटले जाते. मात्र अनेकदा पोलीसही टीकेचेच धनी होतात. एखाद्या घटनेत पोलिसांवरच ताशेरे ओढले जातात. मात्र भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे. रविवारची सकाळ उजाळली ती महापुराची वार्ता घेवून. सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पुरग्रस्तांना मदत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्यूबच्या सहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. भंडारा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध वसाहतीत शनिवारी रात्रीच धाव घेतली. ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, गणेशपूर, नागपूर नाका, प्रगती कॉलनी आदी भागातील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यास मदत केली. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरश: कंबरभर पाण्यातून उचलून आणले. तुमसर, मोहाडी, पवनी पोलीसही यात आघाडीवर होते.

लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर पुरात आपला जीव धोक्यात घालून अनेकांना बाहेर काढले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही या जवानांनी पुरात शिरुन अनेकांना बाहेर काढले. पोलिसांनी केलेल्या या कार्याची कुणी दखल घेतली नसली तरी पुरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हे पोलिसांसाठी सर्वात मोठे अवार्ड होते.

पोलिसांची धडपडलाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला होता. प्रशासनाची मदत पोहोचण्यास विलंब लागत होता. अशा परिस्थितीत लाखांदूर पोलिसांचे पथक गावागावांत जावून पुरग्रस्तांना बाहेर काढत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांसोबत पोलिसांनीही तीन दिवस मदत कार्यात स्वत:ला झोकुन दिले होते. पुरग्रस्तांसाठी पोलीस देवदूतच ठरले. वेळीच पोलीस मदतीला धावून आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :floodपूर