शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

खाकी वर्दीतील देवदूतांनी वाचविले पुरात अडकलेल्या शेकडोंचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून शिरले पुराच्या पाण्यातसुखरुप बाहेर निघालेल्यांचा पोलिसांना सॅल्यूट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करुनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

समाजाचा सजग प्रहरी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असे पोलिसांबाबत म्हटले जाते. मात्र अनेकदा पोलीसही टीकेचेच धनी होतात. एखाद्या घटनेत पोलिसांवरच ताशेरे ओढले जातात. मात्र भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे. रविवारची सकाळ उजाळली ती महापुराची वार्ता घेवून. सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पुरग्रस्तांना मदत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्यूबच्या सहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. भंडारा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध वसाहतीत शनिवारी रात्रीच धाव घेतली. ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, गणेशपूर, नागपूर नाका, प्रगती कॉलनी आदी भागातील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यास मदत केली. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरश: कंबरभर पाण्यातून उचलून आणले. तुमसर, मोहाडी, पवनी पोलीसही यात आघाडीवर होते.

लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर पुरात आपला जीव धोक्यात घालून अनेकांना बाहेर काढले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही या जवानांनी पुरात शिरुन अनेकांना बाहेर काढले. पोलिसांनी केलेल्या या कार्याची कुणी दखल घेतली नसली तरी पुरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हे पोलिसांसाठी सर्वात मोठे अवार्ड होते.

पोलिसांची धडपडलाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला होता. प्रशासनाची मदत पोहोचण्यास विलंब लागत होता. अशा परिस्थितीत लाखांदूर पोलिसांचे पथक गावागावांत जावून पुरग्रस्तांना बाहेर काढत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांसोबत पोलिसांनीही तीन दिवस मदत कार्यात स्वत:ला झोकुन दिले होते. पुरग्रस्तांसाठी पोलीस देवदूतच ठरले. वेळीच पोलीस मदतीला धावून आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :floodपूर