शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

अंगणवाडीतार्इंची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:31 IST

शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.

ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा, हजारोंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी, युनियन (आयटक) व अंगणवाडी कर्मचारी सभा (एचएमएस) यांच्यावतीने भंडारा येथील शास्त्री चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य निमंत्रक दिलीप उटाने, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष सविता लुटे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. इंदिरा गांधी चौक, पोष्ट आॅफिस चौक, बसस्थानक, त्रिमुर्ती चौक मार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात २५ पेक्षा कमी मुले असेल तर ती अंगणवाडी बंद करून शेजारच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरवर्षी मानधन वाढविण्याच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार मानधन देण्यात यावे, लाईन डिस्टींगच्या कामाची सक्ती बंद करावी, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देवून वेतन व भत्ते लागू करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी यासह २० मागण्यांचा समावेश आहे.या मोर्चात सचिव अल्का बोरकर, उपाध्यक्ष मंगला गजभिये, रिता लोखंडे, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, शमीम बानो, मंगला गभने, रेखा टेंभुर्णे, सुनंदा बडवाईक, छाया क्षीरसागर, सदानंद ईलमे, कुंदा भदाडे, लिलावती बडोले, अनिता घोडीचोरे, सुनंदा चौधरी, विजया काळे, वंदना पशिने यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्ष पुष्पा हुमणे, कल्पना साठवणे, शोभा बोरकर, त्रिवेणी माकडे, विणा भोगे, विद्या वाघमारे यांच्यासह जिल्हाभरातील हजारो अंगणवाडीताई मोर्चात सहभागी झाल्या होत्या.शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला तेव्हा अंगणवाडी तार्इंनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीतार्इंची मोठी गर्दी झाली होती. मात्र हा मोर्चा शिस्तबद्ध काढण्यात आला.एकूण लाभार्थी संख्या विचारात घ्याअंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यातच पहिले पाऊल म्हणून कमी संख्या असलेल्या अंगणवाड्या नजीकच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थ्यांची संख्या ठरविताना एकूण लाभार्थ्यांची संख्या विचारात घ्यावी, अशी मागणी मोर्चेकरांची आहे. अंगणवाडी केंद्रातून केवळ तीन ते सहा वर्षांच्या मुलांना सेवा दिली जात नाही तर शून्य ते सहा वर्षाआतील मुलांना सेवा दिली जाते. गरोदर माता, स्तनदामाता, किशोरी मुलींनाही सेवा दिली जाते. राज्यात आजही लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाडी केंद्र उघडले नाही. मात्र अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासनाच्या मुळ उद्देशाला तळा जाईल, असे मोर्चेकरांचे म्हणणे आहे.