शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलाच्या नोकरीची इच्छा राहिली अपुरी

By admin | Updated: June 18, 2017 00:22 IST

सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची ...

प्रकरण जांभोरा येथील शेतकरी आत्मदहनाचेयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची वेदनादायक तितकीच दुदैवी घटना १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद यांचा एकुलता मुलगा मुलचंद हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून बेरोजगारीमुळे रोहयो कामावर जातो. शासनाचे वतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांचे डाटा बेस करण्यात आल्याने मुलाला नोकरी लागून चांगले दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ताराचंदचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृतक ताराचंद शेंदरे यांची अडीच एकर शेती जांभोरा शेतशिवारात एकलकाझरी परिसरात आहे. मागील वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती रोवणी अभावी पडित राहिल्या. शेती कसण्यासाठी त्यांनी नातेवाईक व अन्य लोकांकडून त्यांनी पैसे उसनवार मागितले होते. वारंवारच्या नापिकीमुळे तो त्रस्त होता. निसर्ग जगू देत नाही, अन मरू देत नाही, अशी त्याची अवस्था होती. घटनेच्या दिवसी तो रोजच्या प्रमाणे घरून निघून गेला. परंतू सायंकाळ होवूनही घरी न परतल्याने मुलाने शोध केली असता वडिलाचे मृत शरीर तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे अवस्थेत मिळून आला. घटनेच्या माहिती त्याने सरपंच व ग्रामस्थ व नातेवाईकांना दिली.मुलांनी फोडला हंबरडाशवविच्छेदनासाठी ताराचंद यांचा मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पार्थिव घरी पोहचताच जमलेल्या नातेवाईकांनी, मुलांनी फोडला हंबरडा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी ताराचंदला जांभोरा येथील सागर तलाव स्मशानभूमित अखरेचा निरोप दिला. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकही अधिकारी व पदाधिकारी अंत्ययात्रेकडे फिरकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. अंत्ययात्रेला सरपंच भुपेंद्र पवनकर, सुरेश बिसने, ग्रामपंचायत सदस्य राजघर शेंडे, संजय शहारे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफिची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. कर्जमाफीचे निकष शेतकऱ्यांसाठी कर्दणकाळ ठरणारे आहेत. तृतकाचे परिवाराला मदत व सुशिक्षित पदवीधर अंशकालीन बेरोजगार मुलाला नोकरी देण्याची आवश्यकता आहे, असल्याची प्रतिक्रीया जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी दिली.