शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

अन् मुलाच्या नोकरीची इच्छा राहिली अपुरी

By admin | Updated: June 18, 2017 00:22 IST

सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची ...

प्रकरण जांभोरा येथील शेतकरी आत्मदहनाचेयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची वेदनादायक तितकीच दुदैवी घटना १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद यांचा एकुलता मुलगा मुलचंद हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून बेरोजगारीमुळे रोहयो कामावर जातो. शासनाचे वतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांचे डाटा बेस करण्यात आल्याने मुलाला नोकरी लागून चांगले दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ताराचंदचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृतक ताराचंद शेंदरे यांची अडीच एकर शेती जांभोरा शेतशिवारात एकलकाझरी परिसरात आहे. मागील वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती रोवणी अभावी पडित राहिल्या. शेती कसण्यासाठी त्यांनी नातेवाईक व अन्य लोकांकडून त्यांनी पैसे उसनवार मागितले होते. वारंवारच्या नापिकीमुळे तो त्रस्त होता. निसर्ग जगू देत नाही, अन मरू देत नाही, अशी त्याची अवस्था होती. घटनेच्या दिवसी तो रोजच्या प्रमाणे घरून निघून गेला. परंतू सायंकाळ होवूनही घरी न परतल्याने मुलाने शोध केली असता वडिलाचे मृत शरीर तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे अवस्थेत मिळून आला. घटनेच्या माहिती त्याने सरपंच व ग्रामस्थ व नातेवाईकांना दिली.मुलांनी फोडला हंबरडाशवविच्छेदनासाठी ताराचंद यांचा मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पार्थिव घरी पोहचताच जमलेल्या नातेवाईकांनी, मुलांनी फोडला हंबरडा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी ताराचंदला जांभोरा येथील सागर तलाव स्मशानभूमित अखरेचा निरोप दिला. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकही अधिकारी व पदाधिकारी अंत्ययात्रेकडे फिरकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. अंत्ययात्रेला सरपंच भुपेंद्र पवनकर, सुरेश बिसने, ग्रामपंचायत सदस्य राजघर शेंडे, संजय शहारे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफिची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. कर्जमाफीचे निकष शेतकऱ्यांसाठी कर्दणकाळ ठरणारे आहेत. तृतकाचे परिवाराला मदत व सुशिक्षित पदवीधर अंशकालीन बेरोजगार मुलाला नोकरी देण्याची आवश्यकता आहे, असल्याची प्रतिक्रीया जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी दिली.