शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलाच्या नोकरीची इच्छा राहिली अपुरी

By admin | Updated: June 18, 2017 00:22 IST

सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची ...

प्रकरण जांभोरा येथील शेतकरी आत्मदहनाचेयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची वेदनादायक तितकीच दुदैवी घटना १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद यांचा एकुलता मुलगा मुलचंद हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून बेरोजगारीमुळे रोहयो कामावर जातो. शासनाचे वतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांचे डाटा बेस करण्यात आल्याने मुलाला नोकरी लागून चांगले दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ताराचंदचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृतक ताराचंद शेंदरे यांची अडीच एकर शेती जांभोरा शेतशिवारात एकलकाझरी परिसरात आहे. मागील वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती रोवणी अभावी पडित राहिल्या. शेती कसण्यासाठी त्यांनी नातेवाईक व अन्य लोकांकडून त्यांनी पैसे उसनवार मागितले होते. वारंवारच्या नापिकीमुळे तो त्रस्त होता. निसर्ग जगू देत नाही, अन मरू देत नाही, अशी त्याची अवस्था होती. घटनेच्या दिवसी तो रोजच्या प्रमाणे घरून निघून गेला. परंतू सायंकाळ होवूनही घरी न परतल्याने मुलाने शोध केली असता वडिलाचे मृत शरीर तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे अवस्थेत मिळून आला. घटनेच्या माहिती त्याने सरपंच व ग्रामस्थ व नातेवाईकांना दिली.मुलांनी फोडला हंबरडाशवविच्छेदनासाठी ताराचंद यांचा मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पार्थिव घरी पोहचताच जमलेल्या नातेवाईकांनी, मुलांनी फोडला हंबरडा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी ताराचंदला जांभोरा येथील सागर तलाव स्मशानभूमित अखरेचा निरोप दिला. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकही अधिकारी व पदाधिकारी अंत्ययात्रेकडे फिरकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. अंत्ययात्रेला सरपंच भुपेंद्र पवनकर, सुरेश बिसने, ग्रामपंचायत सदस्य राजघर शेंडे, संजय शहारे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफिची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. कर्जमाफीचे निकष शेतकऱ्यांसाठी कर्दणकाळ ठरणारे आहेत. तृतकाचे परिवाराला मदत व सुशिक्षित पदवीधर अंशकालीन बेरोजगार मुलाला नोकरी देण्याची आवश्यकता आहे, असल्याची प्रतिक्रीया जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी दिली.