शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अन् नववधू पोलीस ठाण्यात पोहोचली...!

By admin | Updated: May 7, 2016 00:59 IST

लग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते.

नवरदेव झाला बेपत्ता : मोहाडी पोलिसांना नवरदेव शोधण्याचे आव्हानराजू बांते मोहाडीलग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते. पण, आल्हाददायक क्षणात विरजन पडले की, मन सुन्न होते. अशीच घटना खरबी येथे घडली. वधू लग्नानंतर वरमंडप जाण्याचे सोडून पोलीस ठाण्यात पोहोचली.खरबी येथील किसनाबाई आगाशे यांच्या घरी वरपक्षाकडून पाहुणे अन् नवरदेव विवाह घटीकेला न पोहोचल्याने नववधू व त्यांच्याकडील आप्तस्वकीयांनी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. अनंदाबाई व सूर्यभान तितिरमारे रा.बोथली यांचा मुलगा कोमल याचा विवाह गोविंद आगाशे यांच्या मुलीशी ५ मे रोजी सकाळी ११.२५ वाजता विवाह ठरलेला होता. नवरदेव पत्रिका वाटायच्या निमित्ताने १ मे रोजी घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. सूर्यभान तितिरमारे यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी वडिलाने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात दाखल केली. मुलगा बेपत्ता असल्याची माहिती वधुपक्षाला कळविण्यात आली. लग्नवेळेपर्यंत मुलगा परत आल्यास लग्न लावले जाईल, अशी ग्वाही मुलाच्या वडिलाने वधुपक्षाला दिली. इकडे मुलीच्या वडिलाने लग्नाची तयारी केली होती. पण पुढे काय होणार याची चिंता सगळ्यांना होती. दोन घराण्यांचे ऋणानुबंध जोडणाऱ्या मंगलघटीकेपर्यंत नवरदेव खरबीत पोहचला नाही. नवरी भावविश्वाची स्वप्ने साकारत होती. पण, नियतीने दगा दिला. अन् संतापलेल्या आगाशे कुटुंबीयांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी दीड वाजता सजलेली नवरी व तिचे आप्त पोलीस ठाण्यात आले. वर पक्षाकडून मुलाचे वडील व त्यांचे नातेवाईकही ठाण्यात पोहोचले. मुलगा परत आला की, लग्न लावायला तयार आहे. मी वरठी पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. अजून त्याचा शोध लागला नाही. मीसुध्दा चिंतीत आहे. माझा मुलगा हरवलाय याची मला काळजी वाटते. तुम्ही चिंता करु नका, अशी विनवणी त्यांनी वधुपक्षाला केली. सामोपचाराने पुढचा वाद निवळला. पण, पुढे काय होते असा प्रश्न दोन्ही पक्षांना सतावत आहे. तिकडे नवरदेवाच्या घरी मंडपच टाकण्यात आला नव्हता. त्याच्या आई-वडिलाला मुलाची चिंता सतावत आहे.साक्षगंधाचाही कार्यक्रम टळलालग्नापूर्वी साक्षगंध करण्याची हिंदू समाजात परंपरा आहे. साक्षगंधाचा कार्यक्रमात रितीप्रमाणे वधूपक्षाकडे मंडपाच्या दिवशी होता. पंरतु नवरा मुलगाच बेपत्ता असल्याने साक्षगंधचाही मुहूर्तही टळला. विवाह मुहूर्त टळला, पण लग्न तुमच्याच मुलाशी होणार हा शब्द वरपक्षाने दिला आहे.मुलगा राज्य परिवहन विभागात नोकरीला आहे. लग्नाच्या त्याने सुट्या घेतलेल्या आहेत. मुलाच्या वडीलाने वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक आठवडा होऊन मुलाचा शोध घेतला नाही. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केले जात आहे. एक मात्र, विवाह मुहूर्त टळला,पण लग्न तर त्याच मुलाशी होणार हा शब्द वर पक्षाने दिला त्यामुळे पोलिसांच्या कारवाया थांबल्या आहेत. मुलगा पळण्याची कारणे मुलगा आल्याशिवाय कळणार नाहीत.