शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन् नववधू पोलीस ठाण्यात पोहोचली...!

By admin | Updated: May 7, 2016 00:59 IST

लग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते.

नवरदेव झाला बेपत्ता : मोहाडी पोलिसांना नवरदेव शोधण्याचे आव्हानराजू बांते मोहाडीलग्न जुळल्यानंतर मुलगी भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. घरातही आनंदमय वातावरण असते. पण, आल्हाददायक क्षणात विरजन पडले की, मन सुन्न होते. अशीच घटना खरबी येथे घडली. वधू लग्नानंतर वरमंडप जाण्याचे सोडून पोलीस ठाण्यात पोहोचली.खरबी येथील किसनाबाई आगाशे यांच्या घरी वरपक्षाकडून पाहुणे अन् नवरदेव विवाह घटीकेला न पोहोचल्याने नववधू व त्यांच्याकडील आप्तस्वकीयांनी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. अनंदाबाई व सूर्यभान तितिरमारे रा.बोथली यांचा मुलगा कोमल याचा विवाह गोविंद आगाशे यांच्या मुलीशी ५ मे रोजी सकाळी ११.२५ वाजता विवाह ठरलेला होता. नवरदेव पत्रिका वाटायच्या निमित्ताने १ मे रोजी घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. सूर्यभान तितिरमारे यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी वडिलाने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात दाखल केली. मुलगा बेपत्ता असल्याची माहिती वधुपक्षाला कळविण्यात आली. लग्नवेळेपर्यंत मुलगा परत आल्यास लग्न लावले जाईल, अशी ग्वाही मुलाच्या वडिलाने वधुपक्षाला दिली. इकडे मुलीच्या वडिलाने लग्नाची तयारी केली होती. पण पुढे काय होणार याची चिंता सगळ्यांना होती. दोन घराण्यांचे ऋणानुबंध जोडणाऱ्या मंगलघटीकेपर्यंत नवरदेव खरबीत पोहचला नाही. नवरी भावविश्वाची स्वप्ने साकारत होती. पण, नियतीने दगा दिला. अन् संतापलेल्या आगाशे कुटुंबीयांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी दीड वाजता सजलेली नवरी व तिचे आप्त पोलीस ठाण्यात आले. वर पक्षाकडून मुलाचे वडील व त्यांचे नातेवाईकही ठाण्यात पोहोचले. मुलगा परत आला की, लग्न लावायला तयार आहे. मी वरठी पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. अजून त्याचा शोध लागला नाही. मीसुध्दा चिंतीत आहे. माझा मुलगा हरवलाय याची मला काळजी वाटते. तुम्ही चिंता करु नका, अशी विनवणी त्यांनी वधुपक्षाला केली. सामोपचाराने पुढचा वाद निवळला. पण, पुढे काय होते असा प्रश्न दोन्ही पक्षांना सतावत आहे. तिकडे नवरदेवाच्या घरी मंडपच टाकण्यात आला नव्हता. त्याच्या आई-वडिलाला मुलाची चिंता सतावत आहे.साक्षगंधाचाही कार्यक्रम टळलालग्नापूर्वी साक्षगंध करण्याची हिंदू समाजात परंपरा आहे. साक्षगंधाचा कार्यक्रमात रितीप्रमाणे वधूपक्षाकडे मंडपाच्या दिवशी होता. पंरतु नवरा मुलगाच बेपत्ता असल्याने साक्षगंधचाही मुहूर्तही टळला. विवाह मुहूर्त टळला, पण लग्न तुमच्याच मुलाशी होणार हा शब्द वरपक्षाने दिला आहे.मुलगा राज्य परिवहन विभागात नोकरीला आहे. लग्नाच्या त्याने सुट्या घेतलेल्या आहेत. मुलाच्या वडीलाने वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक आठवडा होऊन मुलाचा शोध घेतला नाही. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केले जात आहे. एक मात्र, विवाह मुहूर्त टळला,पण लग्न तर त्याच मुलाशी होणार हा शब्द वर पक्षाने दिला त्यामुळे पोलिसांच्या कारवाया थांबल्या आहेत. मुलगा पळण्याची कारणे मुलगा आल्याशिवाय कळणार नाहीत.