शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

लाखांदूर नगरीमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘आम्र महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST

१४ लोक ०१ के लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला ...

१४ लोक ०१ के

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. मात्र, तालुक्यातील एका प्रगतशील सधन शेतकऱ्याने या सर्वांना जोड देत ‘आम्र महोत्सव’ साजरा करुन अक्षय तृतीयेचा सण साजरा केला.

लाखांदूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कुथे पाटील व कुटुंबियांनी अक्षय तृतीयेला आम्र महोत्सव साजरा केला. सुरेश कुथे पाटील हे ग्रामविस्तार अधिकारी होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लाखांदूर येथील गांधी चौक येथे मल्हार फार्म्स पशु भांडारची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना वृक्ष लागवडीची आवड होती. स्वमालकीच्या जवळपास १८ एकर शेतातील बांधावर फणस, विविध जातीचे आंबे, सीताफळ व सागवान वृक्षाची लागवड केली. तर शेतात धान व कडधान्याचे उत्पादनदेखील घेतले. शेतात हळद लागवड व जवळपास दीड एकर शेतात माशाचे उत्पन्न घेतले जाते. त्यांच्या शेतात लंगडा, दशहरी, गावठी, मलगोबा, बैगनपल्ली अशा विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची बागच आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आदर्श ठरावा, अशा कुथे पाटील यांनी स्वत:च्या शेतातील विविध आंबे तोडून घरी चक्क त्या फळांची तोरणमाळ लावत आम्र महोत्सव साजरा केला. बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंना तिलांजली देत बाजारातून नवनवीन वस्तू खरेदी करत वेगवेगळे सण साजरे केले जातात. मात्र, कुथे पाटील यांनी शेतातीलच आम्रफळांना महत्त्व देत येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवत शेतातील पिकांना महत्त्व दिले.

कुथे पाटील त्यांच्या शेताच्या बांधावरील एका आम्रवृक्षापासून यंदा जवळपास २ ते ३ क्विंटल आंबे मिळाले असून, शेतातील सर्व आंब्यांच्या झाडाचे एकूण उत्पादन जवळपास ५० ते ६० क्विंटल निघाले आहे. त्यांनी तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतले आहे. लाखांदूर व परिसरात कुथे पाटलांचे कार्य कौस्तुकापद ठरत आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ मातीच्या कलशांची पूजा करून त्यावर हिंदू संस्कृतीनुसार आंबा फळ ठेवण्याची प्रथा आहे. परंतु, सुरेश कुथे पाटलांनी त्या प्रथेला फाटा देऊन आपल्या दुकानासमोर आम्रफळाचे तोरण बांधून ‘आम्र महोत्सव’ साजरा केला. त्यामुळे गावात व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.