शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

लाखांदूर नगरीमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘आम्र महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST

१४ लोक ०१ के लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला ...

१४ लोक ०१ के

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. मात्र, तालुक्यातील एका प्रगतशील सधन शेतकऱ्याने या सर्वांना जोड देत ‘आम्र महोत्सव’ साजरा करुन अक्षय तृतीयेचा सण साजरा केला.

लाखांदूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कुथे पाटील व कुटुंबियांनी अक्षय तृतीयेला आम्र महोत्सव साजरा केला. सुरेश कुथे पाटील हे ग्रामविस्तार अधिकारी होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लाखांदूर येथील गांधी चौक येथे मल्हार फार्म्स पशु भांडारची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना वृक्ष लागवडीची आवड होती. स्वमालकीच्या जवळपास १८ एकर शेतातील बांधावर फणस, विविध जातीचे आंबे, सीताफळ व सागवान वृक्षाची लागवड केली. तर शेतात धान व कडधान्याचे उत्पादनदेखील घेतले. शेतात हळद लागवड व जवळपास दीड एकर शेतात माशाचे उत्पन्न घेतले जाते. त्यांच्या शेतात लंगडा, दशहरी, गावठी, मलगोबा, बैगनपल्ली अशा विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची बागच आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आदर्श ठरावा, अशा कुथे पाटील यांनी स्वत:च्या शेतातील विविध आंबे तोडून घरी चक्क त्या फळांची तोरणमाळ लावत आम्र महोत्सव साजरा केला. बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंना तिलांजली देत बाजारातून नवनवीन वस्तू खरेदी करत वेगवेगळे सण साजरे केले जातात. मात्र, कुथे पाटील यांनी शेतातीलच आम्रफळांना महत्त्व देत येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवत शेतातील पिकांना महत्त्व दिले.

कुथे पाटील त्यांच्या शेताच्या बांधावरील एका आम्रवृक्षापासून यंदा जवळपास २ ते ३ क्विंटल आंबे मिळाले असून, शेतातील सर्व आंब्यांच्या झाडाचे एकूण उत्पादन जवळपास ५० ते ६० क्विंटल निघाले आहे. त्यांनी तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतले आहे. लाखांदूर व परिसरात कुथे पाटलांचे कार्य कौस्तुकापद ठरत आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ मातीच्या कलशांची पूजा करून त्यावर हिंदू संस्कृतीनुसार आंबा फळ ठेवण्याची प्रथा आहे. परंतु, सुरेश कुथे पाटलांनी त्या प्रथेला फाटा देऊन आपल्या दुकानासमोर आम्रफळाचे तोरण बांधून ‘आम्र महोत्सव’ साजरा केला. त्यामुळे गावात व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.