शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

लाखांदूर नगरीमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘आम्र महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST

१४ लोक ०१ के लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला ...

१४ लोक ०१ के

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. मात्र, तालुक्यातील एका प्रगतशील सधन शेतकऱ्याने या सर्वांना जोड देत ‘आम्र महोत्सव’ साजरा करुन अक्षय तृतीयेचा सण साजरा केला.

लाखांदूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कुथे पाटील व कुटुंबियांनी अक्षय तृतीयेला आम्र महोत्सव साजरा केला. सुरेश कुथे पाटील हे ग्रामविस्तार अधिकारी होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लाखांदूर येथील गांधी चौक येथे मल्हार फार्म्स पशु भांडारची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना वृक्ष लागवडीची आवड होती. स्वमालकीच्या जवळपास १८ एकर शेतातील बांधावर फणस, विविध जातीचे आंबे, सीताफळ व सागवान वृक्षाची लागवड केली. तर शेतात धान व कडधान्याचे उत्पादनदेखील घेतले. शेतात हळद लागवड व जवळपास दीड एकर शेतात माशाचे उत्पन्न घेतले जाते. त्यांच्या शेतात लंगडा, दशहरी, गावठी, मलगोबा, बैगनपल्ली अशा विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची बागच आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आदर्श ठरावा, अशा कुथे पाटील यांनी स्वत:च्या शेतातील विविध आंबे तोडून घरी चक्क त्या फळांची तोरणमाळ लावत आम्र महोत्सव साजरा केला. बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंना तिलांजली देत बाजारातून नवनवीन वस्तू खरेदी करत वेगवेगळे सण साजरे केले जातात. मात्र, कुथे पाटील यांनी शेतातीलच आम्रफळांना महत्त्व देत येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवत शेतातील पिकांना महत्त्व दिले.

कुथे पाटील त्यांच्या शेताच्या बांधावरील एका आम्रवृक्षापासून यंदा जवळपास २ ते ३ क्विंटल आंबे मिळाले असून, शेतातील सर्व आंब्यांच्या झाडाचे एकूण उत्पादन जवळपास ५० ते ६० क्विंटल निघाले आहे. त्यांनी तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतले आहे. लाखांदूर व परिसरात कुथे पाटलांचे कार्य कौस्तुकापद ठरत आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ मातीच्या कलशांची पूजा करून त्यावर हिंदू संस्कृतीनुसार आंबा फळ ठेवण्याची प्रथा आहे. परंतु, सुरेश कुथे पाटलांनी त्या प्रथेला फाटा देऊन आपल्या दुकानासमोर आम्रफळाचे तोरण बांधून ‘आम्र महोत्सव’ साजरा केला. त्यामुळे गावात व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.