शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादकांची रक्कम थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:46 IST

मागील अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत रक्कम अद्याप मिळाली नाही. ऊस उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितले जाते. येथे उधारीवर ऊस कारखान्याला दिले काय, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. २९ जानेवारीपासून कारखान्यासमक्ष आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यात असंतोष : २९ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा, कारखाना व्यवस्थापनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत रक्कम अद्याप मिळाली नाही. ऊस उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितले जाते. येथे उधारीवर ऊस कारखान्याला दिले काय, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. २९ जानेवारीपासून कारखान्यासमक्ष आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिना संपण्याच्या मार्गावर आहे. सुमारे ८०० ते ९०० शेतकºयांचे ऊसाची रक्कम अजुनपर्यंत मानस एॅग्रो कारखान्याने दिली नाही. अनेकदा शेतकरी प्रत्यक्ष साखर कारखान्यात जाऊन थकीत रकमेची मागणी केली. परंतु ऊस उत्पादक शेतकºयांच्या पदरी निराशाच पडली. यापुढे ऊसपीक न घेण्याचा निर्णयही येथील शेतकºयांनी घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकºयांनी ऊस पिकाकरिता खत तथा पाण्याकरिता पैसा खर्च केला. काहींनी कर्ज घेतले. रब्बी पिकांकरिता शेतकºयांना सध्या पैसा हवा आहे. कारखाना हक्काचे पैसे देत नाही. त्यामुळे शेतकºयांना असंतोष खदखदत आहे.सोमवारला पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, काँग्रेसचे युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, कमलाकर निखाडे, रविंंद्र सार्वे, भुपेंद्र साठवणे, देवदास साठवणे, गौरीशंकर पंचबुद्धे, भूषण गायधने यांनी कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांची भेट घेवून शेतकºयांचे थकीत पैसे देण्याची मागणी करून चर्चा केली. २९ जानेवारीपूर्वी शेतकºयांना ऊसाची थकीत रक्कम न मिळाल्यास कारखाण्यासमक्ष उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला. येथे सदर कारखाना प्रशासन मागील महिन्याभरापासून आठवड्याभरात थकीत रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगत आहे. परंतु ती मिळाली नाही. म्हणून टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकाºयांनी सांगितले.