शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष नागरिकांसाठी सदैव उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून जनतेचा विश्वास संपदान करणे सुरु केले. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या परिस्थितीत होती.

ठळक मुद्देप्रत्येकाची भेट घेण्याचा प्रयत्न : संदीप कदम रुजू होताच बदलले जिल्हा कचेरीतील वातावरण

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उच्चपदस्थ अधिकारी म्हटला की त्यांच्या कक्षाचे दार कायम बंद. अभ्यागतांना भेटण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी तर अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळही ठरलेले असतात. मात्र याला अपवाद आहेत भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम. पदभार स्विकारला तेव्हापासून त्यांच्या कक्षाचे दार सदैव उघडे असते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटू शकतो. लोकाभिमूख प्रशासनाच अनुभव जिल्हाधिकारी कार्यालयात येते.हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून जनतेचा विश्वास संपदान करणे सुरु केले. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या परिस्थितीत होती. यावेळी शहरातील विविध सामाजिक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या लागोपाठ बैठका घेवून जनतेमधील कोरोनाची भीती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनाशी प्रशासनाचा लढा सुरु असतांनाच जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामाची अवघ्या दोन आठवड्यात छाप सोडली.यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षचे दार सदैव बंद असायचे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेळ घेवूनच जिल्हाधिकाऱ्यांना भेटता येत होते. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपल्या कक्षाचे दार कायम उघडे राहील अशी सूचना दिली. आता त्यांच्या कक्षाचे दार नेहमी उघडे असते.जिल्हाधिकाºयांना आपल्या कक्षातील खुर्चीवरुन कोण आले आहे, हे दिसून येते. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला भेटण्यांचा त्यांचा प्रयत्न असतो. अगदी आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कक्षाचे दार नागरिकांसाठी उघडे राहत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांप्रती आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोणत्याही अधिकाऱ्याच्या व्हिजीटींग टाईम असू नये. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेतलीच पाहिजे. एखादा व्यक्ती लांब अंतरावरुन पैसे खर्च करुन भेटण्यासाठी येतो. पंरतु अधिकारी भेटत नाही. त्यामुळे वेगळा संदेश जातो. यासाठीच आपण आपल्या कक्षाचे दार उघडे ठेवण्याची सूचना केली. यापूर्वी आपल्या बैठकीचे नियोजन गुगल कॅलेंडरवर प्रसिध्द केले जात होते. त्यामुळे नागरिक नियोजन करुन भेटण्यासाठी येत होते. येथील असाच प्रयोग केला जाईल. प्रत्येकाचा भेट घेण्याचा प्रयत्न राहील.- संदीप कदम, जिल्हाधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी