शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

वाळू उत्खनन विरोधात सरपंचाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे.

ठळक मुद्देआमरण उपोषण सुरू : वाहतुकीमुळे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील वलनी (चौरास) येथील रेती घाटावरून अवैध वाळूचे उत्खनन धडाक्यात सुरु असल्याने गावातील मुलभूत सुविधांना बाधा पोहचत आहे. यासंदर्भात सरपंचानी प्रशासनाला निवेदन दिले. परंतु कार्यवाही न केल्यामुळे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला अआहे. तहसील कार्यालयासमोर सरपंच व ग्राम पंचायत सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत.रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी कठोर कार्यवाही व्हावी म्हणून वलनी ग्राम पंचायतचे सरपंच दीपक तिघरे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदने दिले आहे.मात्र यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही अधिकाऱ्यांनी केलेली नाही. त्यामुळे रेती तस्कर गावातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना तसेच गावकºयांना न जुमानता राजरोसपणे अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत आहेत. रेती तस्करांना गावातील कोणी काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे गावातील जबाबदार व्यक्ती म्हणुन सरपंच दीपक तिघरे, उपसरपंच धनवंता हटवार, सदस्य लक्ष्मी मेश्राम, योगिता तिघरे, किशोर मेश्राम, पुरुषोत्तम सेलोकर, विनायक गभने, शंकर मेश्राम, ग्रामस्थ के. टी. हटवार, माधव वंजारी, खेमराज तिघरे हे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाला बसले आहेत.मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले असून त्यात अवैध रेती उत्खनन त्वरीत थांबविण्यात यावे, वलनी घाटावर तत्काळ महसूल विभागाची चौकी लावण्यात यावी, पोलीस विभागाची गस्त वाढविण्यात यावी, रेती घाटाचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.वलनी घाटावर 30 ऑक्टोम्बर पासून चौकी लावालेली आहे. तलाठी, पोलीस पाटील कोतवाल यांना अवैध रेती उत्खननावर लक्ष ठेवून तात्काळ माहिती द्यावी असे निर्देश दिले आहेत. घाटावरुन अवैध रेती उत्खनन होतांना आढळून आलेले नाही.-गजानन कोकुर्डे, तहसीलदार, पवनी.

टॅग्स :sarpanchसरपंचsandवाळू