शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोपलेल्या वैनगंगेत आयुष्याची कमाईच गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:42 IST

जीवनदायी वैनगंगेने आतापर्यंत भरभरून दिले. मात्र शनिवाराच्या रात्री वैरीण म्हणून गावात शिरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते केले.

ठळक मुद्देपूरग्रस्तांच्या डोळ्यात आता अश्रूंचा महापूरसंसार सावरायचा कसा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पै-पै जोडून संसार उभा केला. चिलापिलांसाठी निवाराही बांधला. जीवनदायी वैनगंगेने आतापर्यंत भरभरून दिले. मात्र शनिवाराच्या रात्री वैरीण म्हणून गावात शिरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते केले. आता पूर ओसरला असून भयभीत डोळ्यांनी घरात काही शिल्लक आहे काय याचा शोध घेत पूरग्रस्त आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. तीन दिवसांच्या विळख्यानंतर आता पूरग्रस्त गावातील विदारक चित्र कुणालाही हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही.

भंडारा जिल्ह्यातून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. भंडारा जिल्ह्याची ओळख आणि जीवनदायी वैनगंगा होय. या वैनगंगेच्या तिरावर सुपिक जमीन असून तिच्याच अंगाखांद्यावर खेळून अनेकांनी समृद्धीची स्वप्न पाहिली. मात्र शनिवारच्या रात्री अचानक वैनगंगा कोपली. महापुराचे पाणी कीर्र अंधारात चोर पावलांनी शिरले. पाहता - पाहता संपूर्ण गाव कवेत घेतले. कुठे जावे असा प्रश्न होता. सर्वत्र अंधार आणि पुराच्या पाण्याचा विळखा होता. असे भंडारा तालुक्यातील जुनी पिंपरी येथील पूरग्रस्त सांगतात.

रात्री पूर चढत असल्याने अनेकांनी गावातील मंदिराचा आश्रय घेतला. दुसऱ्या दिवशी आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आता ही मंडळी तात्पुरत्या शिबिरात आश्रयाला आहेत. आपल्या घराचे काय नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी अनेक जण चिखल तुडवत गावात पोहचत आहेत. मात्र घराचे दृष्य पाहून जणू आभाळ फाटून पायाखालची जमीन सरकल्याचा भास होत आहे. घरात असलेले सर्व वैनगंगेने वाहून नेले. आता सर्व प्रतीक्षा आहे ती शासनाच्या मदतीची. शासन प्रशासनाने भेदभाव न करता मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :floodपूर