शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नावातच असतं सगळं काही !

By admin | Updated: March 2, 2015 00:43 IST

नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते.

लोकमत सर्व्हेक्षणभंडारा : नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते. मुलाचे नामकरण करताना अधिक सजगपणे पालक नावाची निवड करतात, याची प्रचिती ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली. होय, नाही, सांगता येत नाही, स्वत:चे नाव प्रत्येक महिलेला आवडते की नाही, हे पाहणेही रंजक ठरले. स्वत:चे नाव आवडणाऱ्या महिलांची संख्या ६४ टक्के तर नाव आवडत नसल्याची तक्रार ३६ टक्के महिलांनी केली. नाव आवडण्यामागे सर्वच महिलांनी एकमेव कारण सांगताना आपल्या आईवडीलांनी हे नाव ठेवलेले असल्याने ते अधिक आवडते असे सांगितले. नकारात्मक उत्तर देणाऱ्या महिलांनी त्यांच्या नावात शेवटी बाई असा उल्लेख असल्याने नाव उच्चारताना जरासे कसेतरी वाटते, असे सांगत या नावाऐवजी आपले अमुक नाव असते तर बरे झाले असते, असे सांगून टाकले. स्वत:च्या नावाबद्दल जसे अगदी स्पष्टपणे महिलांनी आपली मते नोंदविली. ४६ टक्के महिलांना त्यांच्या घरात टोपननाव आहे आणि त्या नावानेच त्यांचा उल्लेख होत असतो तर ५४ टक्के महिलांनी आपल्याला असे टोपन नाव नसल्याचे सांगितले. महिलांना एकदा नाव बदलण्याचा चॉईस असतो. लग्नानंतर त्यांचे आडनाव जसे बदलून जाते तसेच त्यांचे नावही अनेकदा सासरची मंडळी बदलून टाकतात. लग्नानंतर स्वत:चे नाव बदलून टाकलेल्या महिलांची संख्या आहे ३७ टक्के तर ६३ टक्के महिलांचे नाव मात्र लग्नानंतरही तेच कायम असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. साठ ते सत्तरच्या दशकात हिंदी आणि मराठी चित्रपटांचा पगडा समाजमनावर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अर्थातच मुलांच्या नामकरणावर झाला. मुलांची देवदेवतांची नावे काळाच्या ओघात काहीशी मागे पडली आणि त्याची जागा चित्रपटातील आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्यांच्या नावाने पालकांच्या मनाची पकड घेतली. त्यामुळे मुलांचे नामकरण बबिता, साधना, रेखा, संजय, अमित, मिथून, इथपासून ते अगदी जया, संजीवकुमार, डॉली, इथपर्यंत झाले. ५० वषार्पूर्वीचा किंवा त्या आधीचा काळ हा समाजावर धार्मिक पगडा खूप मोठा असलेला काळ होता. त्यामुळे अर्थातच आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवताना पालकांचा ओढा देवदेवतांची किंवा संतांच्या नावाकडे अधिक असायचा. राम, कृष्ण, सीता, द्रोपदी, मुक्ताई, ज्ञानदेव अशा आशयाची नावे असायची. पती किंवा पत्नीच्या आद्याक्षरावरून आपल्या पाल्याचे नाव पालक ठेवतात. नावात काळाप्रमाणे बदल झाले असले तरी आद्याक्षरांना महत्त्व आजही पालक देताना दिसतात. (लोकमत चमू)