शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

नावातच असतं सगळं काही !

By admin | Updated: March 2, 2015 00:43 IST

नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते.

लोकमत सर्व्हेक्षणभंडारा : नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते. मुलाचे नामकरण करताना अधिक सजगपणे पालक नावाची निवड करतात, याची प्रचिती ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली. होय, नाही, सांगता येत नाही, स्वत:चे नाव प्रत्येक महिलेला आवडते की नाही, हे पाहणेही रंजक ठरले. स्वत:चे नाव आवडणाऱ्या महिलांची संख्या ६४ टक्के तर नाव आवडत नसल्याची तक्रार ३६ टक्के महिलांनी केली. नाव आवडण्यामागे सर्वच महिलांनी एकमेव कारण सांगताना आपल्या आईवडीलांनी हे नाव ठेवलेले असल्याने ते अधिक आवडते असे सांगितले. नकारात्मक उत्तर देणाऱ्या महिलांनी त्यांच्या नावात शेवटी बाई असा उल्लेख असल्याने नाव उच्चारताना जरासे कसेतरी वाटते, असे सांगत या नावाऐवजी आपले अमुक नाव असते तर बरे झाले असते, असे सांगून टाकले. स्वत:च्या नावाबद्दल जसे अगदी स्पष्टपणे महिलांनी आपली मते नोंदविली. ४६ टक्के महिलांना त्यांच्या घरात टोपननाव आहे आणि त्या नावानेच त्यांचा उल्लेख होत असतो तर ५४ टक्के महिलांनी आपल्याला असे टोपन नाव नसल्याचे सांगितले. महिलांना एकदा नाव बदलण्याचा चॉईस असतो. लग्नानंतर त्यांचे आडनाव जसे बदलून जाते तसेच त्यांचे नावही अनेकदा सासरची मंडळी बदलून टाकतात. लग्नानंतर स्वत:चे नाव बदलून टाकलेल्या महिलांची संख्या आहे ३७ टक्के तर ६३ टक्के महिलांचे नाव मात्र लग्नानंतरही तेच कायम असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. साठ ते सत्तरच्या दशकात हिंदी आणि मराठी चित्रपटांचा पगडा समाजमनावर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अर्थातच मुलांच्या नामकरणावर झाला. मुलांची देवदेवतांची नावे काळाच्या ओघात काहीशी मागे पडली आणि त्याची जागा चित्रपटातील आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्यांच्या नावाने पालकांच्या मनाची पकड घेतली. त्यामुळे मुलांचे नामकरण बबिता, साधना, रेखा, संजय, अमित, मिथून, इथपासून ते अगदी जया, संजीवकुमार, डॉली, इथपर्यंत झाले. ५० वषार्पूर्वीचा किंवा त्या आधीचा काळ हा समाजावर धार्मिक पगडा खूप मोठा असलेला काळ होता. त्यामुळे अर्थातच आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवताना पालकांचा ओढा देवदेवतांची किंवा संतांच्या नावाकडे अधिक असायचा. राम, कृष्ण, सीता, द्रोपदी, मुक्ताई, ज्ञानदेव अशा आशयाची नावे असायची. पती किंवा पत्नीच्या आद्याक्षरावरून आपल्या पाल्याचे नाव पालक ठेवतात. नावात काळाप्रमाणे बदल झाले असले तरी आद्याक्षरांना महत्त्व आजही पालक देताना दिसतात. (लोकमत चमू)