शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:38 IST

जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.

ठळक मुद्देआभा शुक्ला : पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा सभेत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी विलास भाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीची माहिती दिली. २०१८-१९ च्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात ट्रिगर दोन लागू झाला आहे. त्यात मोहाडी, पवनी व लाखनी तालुक्यामध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलतींना मंजुरी देण्यात आली. राज्यातील दुष्काळ घोषीत झालेल्या १५१ तालुक्या व्यतिरिक्त जून ते सप्टेंबर २०१८ च्या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या इतर तालुक्यातील २५८ महसूल मंडळात शासनाने दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व पवनी तालुक्यातील आमगाव महसूल मंडळाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात ६५ कामे प्रस्तावित आहे. तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल अंतर्गत १२ नवीन योजना सुरु आहेत. जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नाही. पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ नरेगा अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १२८७ कामे सुरु असून त्यावर ६६ हजार १३९ मजुरांची उपस्थिती आहे. जलयुक्त शिवारची ५० टक्के कामे नरेगांतर्गत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.१२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारीखरीप हंगाम २०१८ ची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात १२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारी असून ७१६ गावे ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारीचे आहेत. काही तालुक्यात अतिरिक्त पीक कापणी प्रयोग घेऊन शासनास प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.१२० कोटींचे पीक कर्ज वाटपजिल्ह्यात खरीप नियोजन करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटप सुरु असून ४३८ कोटींचे उद्दिष्ट्ये जिल्ह्याला सध्या १२० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात चारा टंचाई नसून चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.