शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:38 IST

जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.

ठळक मुद्देआभा शुक्ला : पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा सभेत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी विलास भाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीची माहिती दिली. २०१८-१९ च्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात ट्रिगर दोन लागू झाला आहे. त्यात मोहाडी, पवनी व लाखनी तालुक्यामध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलतींना मंजुरी देण्यात आली. राज्यातील दुष्काळ घोषीत झालेल्या १५१ तालुक्या व्यतिरिक्त जून ते सप्टेंबर २०१८ च्या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या इतर तालुक्यातील २५८ महसूल मंडळात शासनाने दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी व पवनी तालुक्यातील आमगाव महसूल मंडळाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात ६५ कामे प्रस्तावित आहे. तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल अंतर्गत १२ नवीन योजना सुरु आहेत. जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नाही. पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थिती निवारणार्थ नरेगा अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १२८७ कामे सुरु असून त्यावर ६६ हजार १३९ मजुरांची उपस्थिती आहे. जलयुक्त शिवारची ५० टक्के कामे नरेगांतर्गत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.१२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारीखरीप हंगाम २०१८ ची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात १२९ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारी असून ७१६ गावे ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारीचे आहेत. काही तालुक्यात अतिरिक्त पीक कापणी प्रयोग घेऊन शासनास प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.१२० कोटींचे पीक कर्ज वाटपजिल्ह्यात खरीप नियोजन करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटप सुरु असून ४३८ कोटींचे उद्दिष्ट्ये जिल्ह्याला सध्या १२० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात चारा टंचाई नसून चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.