शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:08 IST

भंडारा जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : सहा प्रस्तावित वीज उपकेंद्रासह चार नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने योजना तयार करावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीनीकरण ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.महावितरणच्या मंडळ कार्यालय परिसरात सहा प्रस्तावित वीज उपकेंद्राचे आणि चार नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे होते. यावेळी आ.चरण वाघमारे, आ.राजेश काशिवार, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, गोंदिया परीमंडळाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अधीक्षक अभियंता ओमकार बारापात्रे, राकेश जनबंधू उपस्थित होते.यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, नवीन वीज उपकेंद्राच्या कामावर ३० कोटी रूपये तर लोकार्पण केलेल्या वीज उपकेंद्राच्या कामावर २४ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सद्यस्थितीत शेतकºयांना आठ तास वीज देत आहोत, परंतु सौर ऊर्जेवर कृषी पंपावर १२ तास वीज देणे शक्य होणार आहे. यासाठी स्वतंत्र सौर कृषी वाहिन्यांची गरज आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना दिले आहेत. गावागावांत शेती पंपाला सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी भाडे तत्त्वावर जमीन घेणार असल्याचे जाहीर केले.सन २०३० पर्यंत पूर्व विदर्भात वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी महावितरण व महापारेषणच्या अधिकाºयांनी एकत्रित बसून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकºयांनी व वीज ग्राहकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. मागील दोन वर्षात २४४ कोटी रूपयांची कामे झाले असून तेवढयाच रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत. भंडारा शहरात १५ कोटी रूपये खर्च करून वीज वाहिनी भूमिगत करण्याचे जाहीर केले. मुख्यालयी न राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.प्रस्ताविक अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. संचालन उपकार्यकारी अभियंता पराग फटे यांनी तर आभारप्रदर्शन कार्यकारी अभियंता शर्मिला इंगळे यांनी केले.महावितरणच्या कार्यालयात आढावा बैठकभूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाºयांची महावितरण मंडळ कार्यालयात आढावा बैठक घेतली. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, गोंदिया परीमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, नागपूर परीमंडळाचे मुख्य अभियंता आर.जी. शेख, चंद्रपूर परीमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व महापारेषणचे मुख्य अभियंता व्ही.बी.बढे उपस्थित होते.