शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रेतीतस्कर झाले पुन्हा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपूर्वी वडेगाव रेतीघाटावर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड घालून रेतीसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. आता कारवाईचा बडगा शांत झाल्यानंतर रेतीतस्कर पुन्हा अलर्ट झाले आहेत. चाेरी-छुप्या मार्गाने रेतीचा अवैध व्यवसाय सुरू झाला आहे. साेन्यासारख्या रेतीची सुरक्षा करणारा कुणी वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.एसडीओंवरील हल्ल्याची घटना ताजीच आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मुख्य नेतृत्वात माेठी धाडसी कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही रेतीतस्करी सुरू हाेती, हे या धाडसी कारवाईचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल; परंतु ही फक्त एका रेतीघाटाची कारवाई हाेती. जिल्ह्यात एकेकाळी ९० पेक्षा जास्त रेतीघाट हाेते. ती संख्या राेडावून आता ५० च्या जवळपास आली आहे. फक्त गतवर्षीच्या शासकीय नाेंदीवर नजर घातल्यास १४ रेतीघाटांचे लिलाव झाले हाेते. काेराेनाकाळात झालेली तूटही रेतीमाफियांनी या चार महिन्यांत काढली असावी, एवढी लूट केली आहे.शासकीय संपत्तीची ही खुलेआम लूट करण्यामागे राजकीय पाेशिंदेही मागे नाहीत. रेतीतस्कर सैराट तर अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कारवाई संदर्भातच भीतीचे वातावरण आहे. सेटिंगचा मामला टाॅप टू बाॅटम परफेक्ट असला तरी इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही, असा संदेशही रेतीतस्कर हल्ल्यातून देत आहेत.

रेती घाटांचा लिलाव कधी?- हवे असलेले दर रेती घाटांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक घाटांचा लिलाव गतवर्षी झाला नाही. यावर विभागीय स्तरावरुन मार्गदर्शनही मागविण्यात आले हाेते. आता तस्करांसाठी रान माेकाट करण्यापेक्षा रेतीघाटांचा लिलावतरी करावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी