शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रेतीतस्कर झाले पुन्हा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपूर्वी वडेगाव रेतीघाटावर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड घालून रेतीसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. आता कारवाईचा बडगा शांत झाल्यानंतर रेतीतस्कर पुन्हा अलर्ट झाले आहेत. चाेरी-छुप्या मार्गाने रेतीचा अवैध व्यवसाय सुरू झाला आहे. साेन्यासारख्या रेतीची सुरक्षा करणारा कुणी वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.एसडीओंवरील हल्ल्याची घटना ताजीच आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मुख्य नेतृत्वात माेठी धाडसी कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही रेतीतस्करी सुरू हाेती, हे या धाडसी कारवाईचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल; परंतु ही फक्त एका रेतीघाटाची कारवाई हाेती. जिल्ह्यात एकेकाळी ९० पेक्षा जास्त रेतीघाट हाेते. ती संख्या राेडावून आता ५० च्या जवळपास आली आहे. फक्त गतवर्षीच्या शासकीय नाेंदीवर नजर घातल्यास १४ रेतीघाटांचे लिलाव झाले हाेते. काेराेनाकाळात झालेली तूटही रेतीमाफियांनी या चार महिन्यांत काढली असावी, एवढी लूट केली आहे.शासकीय संपत्तीची ही खुलेआम लूट करण्यामागे राजकीय पाेशिंदेही मागे नाहीत. रेतीतस्कर सैराट तर अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कारवाई संदर्भातच भीतीचे वातावरण आहे. सेटिंगचा मामला टाॅप टू बाॅटम परफेक्ट असला तरी इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही, असा संदेशही रेतीतस्कर हल्ल्यातून देत आहेत.

रेती घाटांचा लिलाव कधी?- हवे असलेले दर रेती घाटांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक घाटांचा लिलाव गतवर्षी झाला नाही. यावर विभागीय स्तरावरुन मार्गदर्शनही मागविण्यात आले हाेते. आता तस्करांसाठी रान माेकाट करण्यापेक्षा रेतीघाटांचा लिलावतरी करावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी