शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

अंमली पदार्थांपासून तरुणाईला सावध करा

By admin | Updated: December 20, 2014 00:39 IST

कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात.

भंडारा : कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात तरुणाईचा समावेश असल्याचे आढळून आले. चरस किंवा गांजा, ड्रग्स (हिरोइन) या सारख्या नशा उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची भंडारा शहरासह अन्य तालुक्याच्या मुख्यालयीही नशा विकण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे. आयुष्याची होते राखरांगोळीदेशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे. दरवर्षी सुशिक्षीत युवकांचा जत्था निघत आहे. या वाढत्या बेरोजगारीकडे आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. बेरोजगार युवक आधीच आयुष्याच्या सुरवातीसाठी स्ट्रगल करतांना दिसतो. त्यात त्याला आलेले अपयश. यामुळे तो गांज्या, गुटका, ड्रग्स यासारख्या आमली पदार्थाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आवश्यकतेनुसारच पैसे द्यावे, अवाजवी पैसे देऊन त्यांना व्यसनाच्या आहारी जाण्यास बाध्य करु नये. तसेच पोलिस प्रशासनाने सज्ज राहून आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच परिसरात आम्ली पदार्थाची विक्रीच होऊ देवू नये.-मदन रामटेके, पं.स. सदस्य, साकोली.व्यसनामुळे मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात गांज्या व ड्रग्सच्या सेवनाने सुरवातीला युवकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्यामुळे ते या व्यसनाच्या आहारी जातात. मात्र हळुहळु त्यांना ही सवय लागल्या नंतर त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही. वारंवार त्याच त्या वस्तुशासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. वेळ आली तर या आमली पदार्थांच्या सेवनाकरीता चोरी, खून यासारखे प्रकार करुन आपली ईच्छा पूर्ण करतात. त्यामुळे प्रशासनाने यावर कठोर भूमीका देऊन हे पदार्थ गावात व परिसरात मिळाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करावे तसेच चित्रपट व टिव्ही वरील कार्यक्रमात याविषयी दाखविण्यात येऊ नये.-डॉ. राजश्ो चंदवानी, साकोलीचोरपावलांनी लागते मादक द्रव्याचे व्यसनमादक द्रव्याचे व्यसन हे कोणत्याही वयात नकळतपणे लागू शकते. हे व्यसन चोर पावलानी येते. कुटूंबातील कलह, विभक्त कुटूंब, अति लाडामुळे बेशिस्त वाढलेली मुले, पैशाचे हिशोब न मागणे, वाईट संगत, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे आदी कारणांमुळेही मादक द्रव्याचे व्यसन लागत असते. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास एकलकोंडीपणा, चोरी करणे, अपघात, अपंगत्व येण्याची शक्यता असतो. समुपदेशन, मैदानी खेळ, व्यायाम, ईश्वरभक्ती, मेडीटेशन, आदर्श लोकांचे चरित्र वाचन केल्यास या समस्येवर निश्चितपणे नियंत्रण मिळविता येवू शकते. समाजात वावरताना प्रत्येकाने सामाजिक सुरक्षीतता यामुळे धोक्यात येणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - डॉ. विक्रम राखडे, पवनीदुर्लक्षामुळे संस्कृतीवर पडतोय घालाआदीच्या काळात संयुक्त कुटूंब पध्दतीमुळे तरुणांवर किंवा किशोरवयीन मुलांवर सहजतेने लक्ष ठेवता येत होते. आधुनिक काळात विभक्त कुटूंब पध्दतीमुळे समाज संस्कृतीवर विपरित परिणाम होत आहे. घराबाहेर पडलेली मुले काय करतात याची जाणीव ही पालकांना नसते. नुसत्या प्रशासनाला दोष देवून चालणार नाही. खुल्या बाजारात गांजा किंवा चरस मिळत असेल व त्याकडे आपण पाहूनही दुर्लक्ष करित असू तर यात सर्वात मोठी चूक आपलीच आहे. झटपट पैसा कमविण्याचा नादात तरुणाईला या व्यसनाकडे ओढले जात आहे. असे नाही की यात श्रीमंताचीच मुले ओढली गेली मध्यम कुटूंबासह गरीबांचे मुलेही या व्यसनाकडे वळली आहे. संस्काराचा पगडा लहानपणापासून भक्कम होणे गरजेचे आहे.- लक्ष्मण साखरे, खुटसावरीपोलिसांचीही जागरुकता महत्वाचीचरस, अफिम, ड्रग्स यासारख्या मादक द्रव्यांची तस्करी शहर असो की ग्रामीण भागात होत असते. मादक द्रव्य कुठून येते, ही तस्करी कोण करतो? याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून वेळोवेळी मिळत असते. कधीकधी तस्करी करणारे एक पाऊल पोलिसांचा पुढे असतात. माहिती मिळताच पोलिस अधिकारी धाडही घालतात. मात्र फितुरीमुळे तस्कर हाती लागत नाही. २० रुपयांचा गांजा आणि १०० रुपयांचा हिरोईनची पुडी बाजारात मिळत असताना, ही पुडी मात्र पोलिसांना का मिळत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. जागरुक असूनही जागरुक नसणे ही बाब अतिशय गंभीर आहे. माहिती मिळाल्यावरही कारवाई होत नसेल तर तस्करी करणाऱ्यांची व तरुणाला व्यसनाकडे ओढण्याची हिम्मत दिवसेंगणीक वाढत चालली आहे. पोलिसांनी या विषयावर खरच जागरुक राहणे गरजेचे आहे.- नरेंद्र पोटवार, लाखनी