शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

अंमली पदार्थांपासून तरुणाईला सावध करा

By admin | Updated: December 20, 2014 00:39 IST

कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात.

भंडारा : कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात तरुणाईचा समावेश असल्याचे आढळून आले. चरस किंवा गांजा, ड्रग्स (हिरोइन) या सारख्या नशा उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची भंडारा शहरासह अन्य तालुक्याच्या मुख्यालयीही नशा विकण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे. आयुष्याची होते राखरांगोळीदेशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे. दरवर्षी सुशिक्षीत युवकांचा जत्था निघत आहे. या वाढत्या बेरोजगारीकडे आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. बेरोजगार युवक आधीच आयुष्याच्या सुरवातीसाठी स्ट्रगल करतांना दिसतो. त्यात त्याला आलेले अपयश. यामुळे तो गांज्या, गुटका, ड्रग्स यासारख्या आमली पदार्थाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आवश्यकतेनुसारच पैसे द्यावे, अवाजवी पैसे देऊन त्यांना व्यसनाच्या आहारी जाण्यास बाध्य करु नये. तसेच पोलिस प्रशासनाने सज्ज राहून आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच परिसरात आम्ली पदार्थाची विक्रीच होऊ देवू नये.-मदन रामटेके, पं.स. सदस्य, साकोली.व्यसनामुळे मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात गांज्या व ड्रग्सच्या सेवनाने सुरवातीला युवकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्यामुळे ते या व्यसनाच्या आहारी जातात. मात्र हळुहळु त्यांना ही सवय लागल्या नंतर त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही. वारंवार त्याच त्या वस्तुशासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. वेळ आली तर या आमली पदार्थांच्या सेवनाकरीता चोरी, खून यासारखे प्रकार करुन आपली ईच्छा पूर्ण करतात. त्यामुळे प्रशासनाने यावर कठोर भूमीका देऊन हे पदार्थ गावात व परिसरात मिळाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करावे तसेच चित्रपट व टिव्ही वरील कार्यक्रमात याविषयी दाखविण्यात येऊ नये.-डॉ. राजश्ो चंदवानी, साकोलीचोरपावलांनी लागते मादक द्रव्याचे व्यसनमादक द्रव्याचे व्यसन हे कोणत्याही वयात नकळतपणे लागू शकते. हे व्यसन चोर पावलानी येते. कुटूंबातील कलह, विभक्त कुटूंब, अति लाडामुळे बेशिस्त वाढलेली मुले, पैशाचे हिशोब न मागणे, वाईट संगत, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे आदी कारणांमुळेही मादक द्रव्याचे व्यसन लागत असते. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास एकलकोंडीपणा, चोरी करणे, अपघात, अपंगत्व येण्याची शक्यता असतो. समुपदेशन, मैदानी खेळ, व्यायाम, ईश्वरभक्ती, मेडीटेशन, आदर्श लोकांचे चरित्र वाचन केल्यास या समस्येवर निश्चितपणे नियंत्रण मिळविता येवू शकते. समाजात वावरताना प्रत्येकाने सामाजिक सुरक्षीतता यामुळे धोक्यात येणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - डॉ. विक्रम राखडे, पवनीदुर्लक्षामुळे संस्कृतीवर पडतोय घालाआदीच्या काळात संयुक्त कुटूंब पध्दतीमुळे तरुणांवर किंवा किशोरवयीन मुलांवर सहजतेने लक्ष ठेवता येत होते. आधुनिक काळात विभक्त कुटूंब पध्दतीमुळे समाज संस्कृतीवर विपरित परिणाम होत आहे. घराबाहेर पडलेली मुले काय करतात याची जाणीव ही पालकांना नसते. नुसत्या प्रशासनाला दोष देवून चालणार नाही. खुल्या बाजारात गांजा किंवा चरस मिळत असेल व त्याकडे आपण पाहूनही दुर्लक्ष करित असू तर यात सर्वात मोठी चूक आपलीच आहे. झटपट पैसा कमविण्याचा नादात तरुणाईला या व्यसनाकडे ओढले जात आहे. असे नाही की यात श्रीमंताचीच मुले ओढली गेली मध्यम कुटूंबासह गरीबांचे मुलेही या व्यसनाकडे वळली आहे. संस्काराचा पगडा लहानपणापासून भक्कम होणे गरजेचे आहे.- लक्ष्मण साखरे, खुटसावरीपोलिसांचीही जागरुकता महत्वाचीचरस, अफिम, ड्रग्स यासारख्या मादक द्रव्यांची तस्करी शहर असो की ग्रामीण भागात होत असते. मादक द्रव्य कुठून येते, ही तस्करी कोण करतो? याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून वेळोवेळी मिळत असते. कधीकधी तस्करी करणारे एक पाऊल पोलिसांचा पुढे असतात. माहिती मिळताच पोलिस अधिकारी धाडही घालतात. मात्र फितुरीमुळे तस्कर हाती लागत नाही. २० रुपयांचा गांजा आणि १०० रुपयांचा हिरोईनची पुडी बाजारात मिळत असताना, ही पुडी मात्र पोलिसांना का मिळत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. जागरुक असूनही जागरुक नसणे ही बाब अतिशय गंभीर आहे. माहिती मिळाल्यावरही कारवाई होत नसेल तर तस्करी करणाऱ्यांची व तरुणाला व्यसनाकडे ओढण्याची हिम्मत दिवसेंगणीक वाढत चालली आहे. पोलिसांनी या विषयावर खरच जागरुक राहणे गरजेचे आहे.- नरेंद्र पोटवार, लाखनी