शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

कृषी विभागाचे कर्मचारी कोरोना लसीकरणापासून अद्यापही वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

भंडारा : संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. यामुळे शासनाने शासकीय अधिकारी व ...

भंडारा : संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. यामुळे शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राध्यान्याने कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात खरीप हंगामापासून सातत्याने नैसर्गिक संकटांमुळे पीक नुकसानासह विविध कामांत व्यस्त असणारे जिल्ह्यातील ३६१ कृषी कर्मचारी, अधिकारी अद्यापही कोरोना लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

मार्च, एप्रिल २०२०मध्ये कोरोना आला तेव्हापासून कृषी विभागाचे कर्मचारी कर्तव्य निभावत आहेत. त्यानंतर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये आलेला महापूर, विविध मंत्र्यांचे दौरे, शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या पाहणी कामात व्यस्त असलेले कृषी कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्याची आठवण जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत खरोखरच झाली नसेल का? एरव्ही कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अकृषक कामेही दिली जातात. जिल्ह्यात पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यातीलही काहीजण अद्याप लस घेण्याचे बाकी आहेत. मात्र, ग्रामीण स्तरावर दररोज अनेक शेतकऱ्यांशी संपर्क येत असलेल्या कृषी सहाय्यकांना आतापर्यंत कोरोना लस का? देण्यात आली नाही, याची चर्चा होत आहे. एका कृषी सहाय्यकाकडे दोन ते तीन पदभार असून, तब्बल १० ते १२ गावांचा कारभार एकाच कृषी सहाय्यकावर आहे. हीच अवस्था कृषी अधिकाऱ्यांचीही आहे. मात्र, त्यांना आपले मत व्यक्त करता येत नाही. यावर्षी जुलैच्या सुरुवातीला पावसाचा खंड, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये आलेला महापूर, शेवटच्या टप्प्यात धान पीक काढणीला आल्यानंतर तुडतुडा रोगाने घातलेले थैमान यामुळे कृषी कर्मचारी अद्यापही नुकसानाचे पंचनामे करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

यासोबतच कृषी सहाय्यकांना ग्रामीण स्तरावर शेतकरी प्रशिक्षणे, शेतकऱ्यांना कीडरोगाविषयी मार्गदर्शन करणे, सरपंच, उपसरपंच, पीक कापणी प्रयोगाची कामे करताना अनेकांशी संपर्क येतो. मात्र, ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक अद्याप कोरोना लसीकरणापासून वंचितच राहिला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक कृषी सहाय्यकांनी कर्तव्य निभावले आहे. कृषी सहाय्यकांना प्राधान्याने जिल्हा प्रशासनाने वेळेत लसीकरण करण्याची गरज होती. मात्र, याकडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष केले जात नाही ना, अशी चर्चा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाचा महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग जेवढी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे, तेवढीच महत्त्वाची भूमिका कृषी विभागाची आहे. कारण जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. मात्र, तरीही अद्याप आरोग्य विभागाने कृषी सहाय्यकांच्या कोरोना लसीकरणाचे नियोजन केलेले नाही. यामुळे कृषी कर्मचार्‍यांसह, शेतकऱ्यांमधूनही प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

बॉक्स

कृषी सहाय्यकांना लस द्यायला इतका विलंब का

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत वयोवृद्ध नागरिक, पोलीस, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी या सर्वांना कोरोनाची लस देण्यात आली. मात्र, जिल्ह्यात कुठेही कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती नाही. कृषी विभागाने लसीकरणाबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता, याविषयीची माहिती प्रत्येक तालुका स्तरावरुन घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

राज्य शासनाकडूनही होत आहे दुजाभाव

ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या महसूल विभागातील तलाठ्यांना मदतनीस म्हणून कोतवालाची नियुक्ती केली आहे. ग्रामसेवकांच्या मदतीसाठी ग्रामपंचायतीचे शिपाई आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांच्या मदतीलाही आशा सेविका आहेत. यासोबतच तलाठ्यांना टॅब, प्रिंटरही दिले आहेत. ग्रामसेवकांनाही ग्रामपंचायतीमध्ये कम्प्युटर प्रिंटरची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, कृषिप्रधान देशात कृषी सहाय्यकांच्या मदतीसाठी अजूनही ग्रामस्तरावर कोणताही मदतनीस दिलेला नाही की कृषी सहाय्यकांची अनेक वर्षांची लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटरची मागणीही सरकारने मान्य केलेली नाही. विविध योजनांचे १००हून जास्त ॲप स्वत:च्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून कामे करताना अनेकदा मोबाईल बंद पडतात. याचवेळी काम वेळेत झाले नाही तर कृषी विभागाचे अधिकारीच नव्हे तर पंचायत समिती, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातूनही वारंवार फोन येतात. कृषिप्रधान देशात कोणतेही सरकार आले तरी धोरणात बदल होत नसल्याने यात कृषी कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक मरण होत आहे.

बॉक्स

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे मृत्यू व कोरोनाबाधित कृषी विभागात

राज्यभरात यावर्षी पिकांच्या नुकसानाचे पंचनामे, शेतकरी प्रशिक्षणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच विविध वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांचे दौरे प्रत्येक जिल्ह्यात झाल्याने राज्यात सर्वाधिक कृषी कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. इतकेच नव्हे तर राज्यात सांगली, बुलडाणा, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांतील कृषी सहाय्यकांचा मृत्यूही झाला होता. तसेच कृषी अधिकाऱ्यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, त्यांचे कुटुंबीय अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम हे कृषी राज्यमंत्री आहेत. मात्र, पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अद्याप कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसेल तर राज्यातील इतर कृषी कर्मचाऱ्यांना केव्हा न्याय मिळेल, अशी चर्चा होत आहे.

.