शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

बावनथडी नदीपात्रात शेती गडप

By admin | Updated: December 3, 2014 22:44 IST

बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप : नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे मागणीचुल्हाड (सिहोरा) : बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.अडीच हजार लोकवस्ती असलेल्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदी काठावर शेतकऱ्यांची बागायती शेती आहे. या शेतकऱ्यांना नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. या नदीच्या पात्राने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरूपात असलेला पात्राने नदीचे विशाल रूप घेतले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने वाढत आहे. या वाढत्या पात्रात गावातील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यात २० हुन अधिक विहीरी भुईसपाट झालेल्या आहेत. नदी काठालगत या विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहे. गावातील शेतकऱ्यांवर वाढत्या पात्राने संकट ओढवले आहे. नदी पात्रात शेती समाविष्ठ झाल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झालेली आहे. तर अनेकांना भूमिहीन होण्याची पाळी आली आहे. यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी गावही सोडले आहेत. वडिलोपार्जीत शेती नदी पात्रात गिळंकृत झाल्याचे दु:ख गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात राजकारण झाले आहे. तत्कालीन पालकमंत्री बंडू सावरबांधे यांनी गावातील शेतकऱ्यांना विहीरी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु या विहीरी आजवर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचल्या नाहीत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी गावाला भेट दिली होती. परंतु शेतकऱ्यांना मदत वाटपाचा पॅकेज दिला नाही. त्यांनी गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले. १२५ कुटूंबियाचे पुनर्वसन झाले आहे. (वार्ताहर)