शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

By admin | Updated: June 14, 2014 01:35 IST

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला.

लाखांदूर : पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला. खते, औषधी, बियाणांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी कृषी विभागाने कार्यक्रम आखून ठेवला. मात्र शासनाच्या अनेक कृषीविषयक योजना बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.लाखांदूर तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवड केली जाते. यामध्ये २४ हजार ५०० हेक्टरमध्ये रोवणी तर ४ हजार हेक्टरमध्ये आवत्या असते. ७० हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केली जाते. दरवर्षी रासायनिक खताचा भासणारा तुटवडा लक्षात घेता कृषी विभागाने सुनियोजन करून यापूर्वी ९ हजार मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी ४,५०० मेट्रीक टन युरिया व मिश्र खतांचा पुरवठा करण्यात आला. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी खत बियाणे औषधीसाठी जुळवाजुळव करणे सुरु असले तरी शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदानावर उपलब्ध होणारे बियाणे वाटप शासनाने बंद केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. धान्याचे दर कमी, मजुरीत वाढ, रासायनिक खतांचे वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. विविध नामांकीत कंपन्यांकडून बाजारात आलेल्या बियाणाांमुळे शेतकऱ्यांनी परंपरागत धान्य बियाण्यांकडे पाठ फिरविली आहे. सध्यास्थितीत लाखांदूर तालुक्यात खताचे ११० कृषी केंद्र बियाणे ६३ ट्रकाने तर औषध् िवक्रीचे परवानाप्राप्त ७१ दुकाने आहेत. दुकानात ४५ धान बियाण्यांचे प्रकार दुकानात असल्याने शेतकरी भांबावून गेले आहे. नेमके कोणते बियाणे शेतीसाठी योग्य आहे हा विचार करण्याची वेळ दुकानदार शेतकऱ्याला देत नसल्याने पीक निघाल्यानंतर शेतकऱ्याला नफा व तोट्याच्या आकडेवारीत त्रास होणार आहे. पंचायत समितीच्यावतीने २० मे रोजी बियाणे नमुना दिन पाळण्यात आला. कृषी विषयक योजना बंदशेतकरी हिताचे अनुदानप्राप्त अन्न सुरक्षा अभियान योजनेचा शासनाने यावर्षी गाशा गुंडाळला असून अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. केवळ जे.जी.एल. वाणाचे बियाणे अनुदानावर मिळणार आहेत. जर बांधावर खत ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी होती. ही योजनासुद्धा शासनाने यावर्षीपासून बंद केली. शेतकरी हिताच्या योजना, राज्य सरकाराने अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)