लाखांदूर : पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला. खते, औषधी, बियाणांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी कृषी विभागाने कार्यक्रम आखून ठेवला. मात्र शासनाच्या अनेक कृषीविषयक योजना बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.लाखांदूर तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवड केली जाते. यामध्ये २४ हजार ५०० हेक्टरमध्ये रोवणी तर ४ हजार हेक्टरमध्ये आवत्या असते. ७० हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केली जाते. दरवर्षी रासायनिक खताचा भासणारा तुटवडा लक्षात घेता कृषी विभागाने सुनियोजन करून यापूर्वी ९ हजार मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी ४,५०० मेट्रीक टन युरिया व मिश्र खतांचा पुरवठा करण्यात आला. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी खत बियाणे औषधीसाठी जुळवाजुळव करणे सुरु असले तरी शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदानावर उपलब्ध होणारे बियाणे वाटप शासनाने बंद केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. धान्याचे दर कमी, मजुरीत वाढ, रासायनिक खतांचे वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. विविध नामांकीत कंपन्यांकडून बाजारात आलेल्या बियाणाांमुळे शेतकऱ्यांनी परंपरागत धान्य बियाण्यांकडे पाठ फिरविली आहे. सध्यास्थितीत लाखांदूर तालुक्यात खताचे ११० कृषी केंद्र बियाणे ६३ ट्रकाने तर औषध् िवक्रीचे परवानाप्राप्त ७१ दुकाने आहेत. दुकानात ४५ धान बियाण्यांचे प्रकार दुकानात असल्याने शेतकरी भांबावून गेले आहे. नेमके कोणते बियाणे शेतीसाठी योग्य आहे हा विचार करण्याची वेळ दुकानदार शेतकऱ्याला देत नसल्याने पीक निघाल्यानंतर शेतकऱ्याला नफा व तोट्याच्या आकडेवारीत त्रास होणार आहे. पंचायत समितीच्यावतीने २० मे रोजी बियाणे नमुना दिन पाळण्यात आला. कृषी विषयक योजना बंदशेतकरी हिताचे अनुदानप्राप्त अन्न सुरक्षा अभियान योजनेचा शासनाने यावर्षी गाशा गुंडाळला असून अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. केवळ जे.जी.एल. वाणाचे बियाणे अनुदानावर मिळणार आहेत. जर बांधावर खत ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी होती. ही योजनासुद्धा शासनाने यावर्षीपासून बंद केली. शेतकरी हिताच्या योजना, राज्य सरकाराने अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज
By admin | Updated: June 14, 2014 01:35 IST