शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

शेतीपूरक व्यवसाय, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

By admin | Updated: July 16, 2016 00:36 IST

भंडारा जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसायाला प्रचंड वाव असून शेतीपूरक व्यवसायासोबत कौशल्य विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण,....

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद भंडारा : भंडारा जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसायाला प्रचंड वाव असून शेतीपूरक व्यवसायासोबत कौशल्य विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जोडधंदे, जलयुक्त शिवार, माजी मालगुजारी तलावांची दुरूस्ती व खोलीकरण, भाजीपाला क्लस्टर आणि पर्यावरणपूरक पर्यटन या विषयांवर आपला भर राहणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात शुक्रवारला माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत चागले असून हा पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा सिंचनासाठी वापर करणे सोयीचे होईल. मामा तलाव व जुन्या तलावांची संख्या मोठया प्रमाणात असून या तलावांचे सर्वेक्षण करुन नुतनीकरण व दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिल्यास त्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे, असे सांगितले. दुबार पेरणीसाठीसुध्दा या तलावातील पाणी उपयोगी पडेल. यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाला प्राधान्य दिल्यास शेती सोबत पुरकव्यवसाय व शेती आधारित जोडधंदे या माध्यमातून नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकते. यादृष्टीने कौशल्यावर आधारित व्यवसाय व शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल. वैनगंगा नदी या जिल्ह्याला लाभली असून वैनगंगेचा किनारा असलेल्या गावांमध्ये भाजीपाला क्लस्टर निर्माण केल्यास गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होईल. यासोबतच डेअरी फार्मिंग, गोटफार्मिंग व दुग्धव्यवसाय असा जोडधंद केल्यास शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात या दिशेने काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येईल, असे सांगितले. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होतील तेव्हा जिल्ह्याच्या पाणी पातळीत निश्चित वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मुलांमुलींना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी उपाय योजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सोबतच शासनाच्या योजना प्राधान्याने राबवून विकासासाठी प्रयत्नशिल राहू, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)