शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

वय वर्षे ७४, पण आयुष्यात एकदाही वाहनाने प्रवास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी आई-वडिलांना मदत करणे सुरू केले. कधी शेतात तर कधी माेलमजुरीचे काम करू लागले. लहान वयात उन्हाळ्यात दरराेज जंगलात २० ते २५ किमी भटकंती करून डिंक गाेळा करायचे. पावसाळ्यात रानभाज्या गाेळा करण्याचे नित्याचे काम झाले हाेते. परिस्थितीमुळे कधी सायकललाही त्यांचा लहानपणी स्पर्श झाला नाही. वय वाढत गेले. लग्न झाले. मुले झाली, परंतु पायी चालण्याची सवय मात्र तुटू दिली नाही. 

ठळक मुद्देवेगवान युगात अजब व्यक्तिमत्त्व : कुठेही जायचे असेल तर पायी वारी

दयाल भाेवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वेगवान युगात वाहनाशिवाय घराबाहेर पडणेही कठीण. कुठेही जायचे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहनाचा आधार हवाच. माेठ्या प्रवासासाठी रेल्वे आणि विमानसेवाही आहे. परंतु अख्ख्या आयुष्यात कुणी वाहनात पायच ठेवला नाही असे सांगितले तर आश्चर्य वाटेल ना! मात्र हे खरे आहे. लाखांदूर तालुक्यातील ७४ वर्षीय आनंदराव खाेब्रागडे यांनी आजपर्यंत कधीही वाहनाने प्रवास केला नाही. कुठेही जायचे असले की त्यांची पायी वारी ठरलेली असते. हीच त्यांची परिसरात ओळख आहे.  वेगवान युगातील आनंदराव म्हणजे अजब व्यक्तिमत्त्वच म्हणावे लागेल. लाखांदूर तालुक्यातील साेनी गावात आनंदराव यांचा जन्म झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी कुटुंबाचा गाडा हाकीत त्यांना माेठे केले. समज येताच परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी आई-वडिलांना मदत करणे सुरू केले. कधी शेतात तर कधी माेलमजुरीचे काम करू लागले. लहान वयात उन्हाळ्यात दरराेज जंगलात २० ते २५ किमी भटकंती करून डिंक गाेळा करायचे. पावसाळ्यात रानभाज्या गाेळा करण्याचे नित्याचे काम झाले हाेते. परिस्थितीमुळे कधी सायकललाही त्यांचा लहानपणी स्पर्श झाला नाही. वय वाढत गेले. लग्न झाले. मुले झाली, परंतु पायी चालण्याची सवय मात्र तुटू दिली नाही. आजही कुठेही जायचे असले की आपली पायी वारी ठरलेली असते. परिसरात त्यांना पैदल वारी म्हणूनच ओळखले जाते. वयाच्या ७५व्या वर्षातही ते दरराेज ३० ते ४० किमी पायी चालत असतात. असे हे आनंदराव तरुणांसाठी प्रेरणा आहे.     

एसटीच्या सवलतीचाही फायदा नाही- राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सवलत पासही आहे. परंतु या सवलतीचाही कधी फायदा घेतला नाही. गुरुवारी ते साेनी या आपल्या गावाहून ९ किमी लाखांदूर येथे तहसीलच्या ठिकाणी आले. तहसीलमधील काम आटाेपून पुन्हा ९ किमी पायीच गेले. यांत्रिकीकरणाच्या युगात हा झपाटलेला माणूस रस्त्याने झपाझप चालताना लाखांदूर तालुक्यात दिसून येताे. 

तंदुरुस्त आराेग्याचे रहस्यदरराेज नियमित २० ते ३० किमी या वयातही आनंदराव पायीच चालतात. त्यामुळे आजपर्यंत त्यांना काेणत्या आजाराने स्पर्शही केला नाही. रक्तदाब, रक्तशर्करा किंवा इतर कुठल्याही आजाराची बाधा झाली नाही. ठणठणीत प्रकृती आहे. यामागचे रहस्य म्हणजे पायी चालणे असल्याचे आनंदराव अभिमानाने सांगतात.

 

टॅग्स :Healthआरोग्य