शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

वर्षभरानंतर मिळाले जिल्हा ग्राहक मंचाला अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:37 IST

उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत होते. अखेर राज्य शासनाने अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. लवकरच ते अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देतक्रारींच्या निपटाऱ्याला येणार वेग : अध्यक्षपदी दिलीपकुमार देशमुख यांची वर्णी

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत होते. अखेर राज्य शासनाने अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. लवकरच ते अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.भंडारा जिल्हा तक्रार निवारण मंचात ८ जुलै २०१६ ते १४ जुलै २०१७ या काळात अध्यक्ष म्हणून ए.जी. चिलबुले यांनी कार्यभार सांभाळला त्यानंतर पासून मंचला अध्यक्ष नसल्यामुळे अनेक प्रकरणे पडून होते. त्यानंतर १६ जुलै २०१८ पासून आजपर्यत प्रभारी अध्यक्ष म्हणून भास्कर डी. योगी कार्यभार सांभाळत आहेत. वर्षभरापासून स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे महावितरण कंपनी, उत्पादक कंपनी, बँक, बांधकाम व्यावसायिक व शेती व्यवसायामध्ये विविध कंपन्यांनी दिलेल्या बिलांमधून अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी विविध कारणास्तव ग्राहक मंचामध्ये धाव घेतली आहे. परंतू स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे न्याय मागण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. सध्या स्थितीत येथील कारभार प्रभारी अध्यक्षांच्या खांद्यावर आहे. गणेशपूर मार्गावर निवारण मंचची प्रशस्त ईमारत आहे. या कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयावर शासनाचा ५० ते ६० लाख रूपये वार्षिक खर्च होतो. परंतू अलिकडे येथे अनेक पद रिक्त असल्यामुळे कामाचा ताण वाढलेला दिसून येतो. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच एक निर्णय काढून भंडारा येथील ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्षपदी दिलीपकुमार दुदलाजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शपथपत्र व हमीपत्र राज्य आयोगाला सादर केल्यानंतर व त्यांनी त्यांच्या पदाचा प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्यानंतर प्रभावी होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांच्या येण्याची प्रतीक्षा आहे.