शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

आठवडाभरानंतर करडी परिसरात बरसला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे.

ठळक मुद्देकोमेजलेल्या पराह्यना जीवनदान : रोवणीसाठी मुसळधार पावसाची गरज

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविना पडीत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सुरु केलेली रोवणी रखडलेली आहेत. त्यातच आठ तास विजेच्या पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कोमेजलेल्या पराह्यना जीवनदान मिळाले. परंतु कडक उन्हाने तापलेल्या शेतीला रोवणीसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. उन सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला आहे. आता आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. परंतु अजूनही तापलेल्या शेतीची भूक शमलेली नाही. रोवणीसाठी पर्याप्त पाण्याचा साठा शेतात झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे.विजेने वाढविली समस्याजिल्ह्यात आठ तासाची वीज शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करणारी आहे. कडक उन्हात शेतीला सिंचन करण्याची क्षमता आठ तासाच्या विजेत नाही. त्यातच वारंवारच्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना फक्त सात तासाची वीज मिळत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतीचे बजेट बिघडले आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या समस्येने आणखी ग्रासले आहे.कृषी सेवा केंद्रांचा काळाबाजारमोहाडी तालुक्यात खत व कीटकनाशकांच्या काळाबाजाराला उधाण आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पहिल्या धाडीत करडी परिसरातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले होते. कृषी सेवा केंद्रानी शेतकºयांना अधिक भाव खत व कीटकनाशके विकणे, बिल न देणे आदी प्रमुख कारणांसह कारवाई केली होती. परंतु अजूनही ही समस्या सुटलेली नाही. शेतकºयांची पिळवणूक सुरुच आहे.

टॅग्स :Rainपाऊस