शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

आठवडाभरानंतर करडी परिसरात बरसला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे.

ठळक मुद्देकोमेजलेल्या पराह्यना जीवनदान : रोवणीसाठी मुसळधार पावसाची गरज

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविना पडीत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सुरु केलेली रोवणी रखडलेली आहेत. त्यातच आठ तास विजेच्या पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कोमेजलेल्या पराह्यना जीवनदान मिळाले. परंतु कडक उन्हाने तापलेल्या शेतीला रोवणीसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. उन सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला आहे. आता आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. परंतु अजूनही तापलेल्या शेतीची भूक शमलेली नाही. रोवणीसाठी पर्याप्त पाण्याचा साठा शेतात झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे.विजेने वाढविली समस्याजिल्ह्यात आठ तासाची वीज शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करणारी आहे. कडक उन्हात शेतीला सिंचन करण्याची क्षमता आठ तासाच्या विजेत नाही. त्यातच वारंवारच्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना फक्त सात तासाची वीज मिळत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतीचे बजेट बिघडले आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या समस्येने आणखी ग्रासले आहे.कृषी सेवा केंद्रांचा काळाबाजारमोहाडी तालुक्यात खत व कीटकनाशकांच्या काळाबाजाराला उधाण आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पहिल्या धाडीत करडी परिसरातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले होते. कृषी सेवा केंद्रानी शेतकºयांना अधिक भाव खत व कीटकनाशके विकणे, बिल न देणे आदी प्रमुख कारणांसह कारवाई केली होती. परंतु अजूनही ही समस्या सुटलेली नाही. शेतकºयांची पिळवणूक सुरुच आहे.

टॅग्स :Rainपाऊस