शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवकाळी पावसानंतर जिल्हा कडाक्याच्या थंडीने गारठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. तापमानात कमालीची घट झाली असून दिवसाच्या तापमानातही मोठी घट नोंदविली जात आहे.

ठळक मुद्देपारा नऊ अंशापर्यंत घसरला । शहरी व ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पावसानंतर आकाश निरभ्र झाले आणि थंडीत वाढ झाली. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवायला लागली. पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला असून रात्री तर घराबाहेर निघणेही कठीण होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असून उब मिळविण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. तापमानात कमालीची घट झाली असून दिवसाच्या तापमानातही मोठी घट नोंदविली जात आहे. पहाटेपासूनच गार वारे वाहत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी कायम आहे. रात्री तर घराबाहेर निघणेही कठीण होते.या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही शेकोट्या पेटविल्याचे चित्र आहे. सकाळ-सायंकाळ शेकोट्या पेटविल्या जात असून प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या वातावरणाचा दबा आजाराने ग्रस्त रुग्णांना कमालीचा त्रास होत आहे. लहान बालकांमध्ये सर्दी, पडसा, खोकला यासह तापीची लक्षणे दिसत आहेत.कडाक्याच्या थंडीचा फायदा रबी पिकांना होणार, असे जानकार शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड होत असून या पिकासाठी थंडी उपयुक्त ठरत आहे. हरभरा आणि इतर रबी पिकांसाठी थंडी उपयुक्त असली तरी कडाक्याच्या थंडीने तुरीचा फुलोर जळण्याची भीती आहे. भाजीपाला पिकांना मात्र या कडाक्याच्या थंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतशिवारात सध्या उन्हाळी धानाच्या रोवणीचा हंगाम सुरू असून या कडाक्याच्या थंडीमुळे मजूर शेतात येण्यास तयार नाही

टॅग्स :weatherहवामान