शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन केल्यास पाणी समस्या दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे.

ठळक मुद्देशिल्पा सोनाले : तुमसर, मोहाडी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी परिस्थिती बदलविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय जलयुक्त अभियान समितीचे शिल्पा सोनाले यांनी केले.मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, तुमसर व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात मंगळवारला कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अ‍ॅड.संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, जलमित्र हिवराज उके, तालुका कृषी अधिकारी मोहाडीचे के.जी. पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी तुमसरचे एस.जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी मोहाडी आर.जी. गायकवाड आदी उपस्थित होते. अ‍ॅड.संजीव गजभिये यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती प्रत्येकांनी जाणल्यास त्यांना पाण्याचे महत्व कळेल, असे प्रतिपादन केले.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, गौतम नितनवरे, विठ्ठल निब्रड, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, व्याप्ती, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मोहाडी व तुमसर तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकुण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते.कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराचे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व तुमसर येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.