शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

नियोजन केल्यास पाणी समस्या दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे.

ठळक मुद्देशिल्पा सोनाले : तुमसर, मोहाडी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी परिस्थिती बदलविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय जलयुक्त अभियान समितीचे शिल्पा सोनाले यांनी केले.मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, तुमसर व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात मंगळवारला कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अ‍ॅड.संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, जलमित्र हिवराज उके, तालुका कृषी अधिकारी मोहाडीचे के.जी. पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी तुमसरचे एस.जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी मोहाडी आर.जी. गायकवाड आदी उपस्थित होते. अ‍ॅड.संजीव गजभिये यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती प्रत्येकांनी जाणल्यास त्यांना पाण्याचे महत्व कळेल, असे प्रतिपादन केले.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, गौतम नितनवरे, विठ्ठल निब्रड, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, व्याप्ती, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मोहाडी व तुमसर तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकुण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते.कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराचे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व तुमसर येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.