शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नियोजन केल्यास पाणी समस्या दूर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे.

ठळक मुद्देशिल्पा सोनाले : तुमसर, मोहाडी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी परिस्थिती बदलविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय जलयुक्त अभियान समितीचे शिल्पा सोनाले यांनी केले.मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, तुमसर व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात मंगळवारला कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अ‍ॅड.संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, जलमित्र हिवराज उके, तालुका कृषी अधिकारी मोहाडीचे के.जी. पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी तुमसरचे एस.जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी मोहाडी आर.जी. गायकवाड आदी उपस्थित होते. अ‍ॅड.संजीव गजभिये यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती प्रत्येकांनी जाणल्यास त्यांना पाण्याचे महत्व कळेल, असे प्रतिपादन केले.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, गौतम नितनवरे, विठ्ठल निब्रड, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, व्याप्ती, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मोहाडी व तुमसर तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकुण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते.कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराचे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व तुमसर येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.