शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

बोदरा तलावाची पाळ फुटल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले.

ठळक मुद्देजलसंधारण विभागातर्फे उपाययोजना शून्य : चौकशी करून दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे साकोली तालुक्यातील बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. यामुळे तलावातील ९० टक्के पाणी आधीच वाहून गेले असून या तलावात दररोज पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मात्र संबंधित विभागाने अजूनपर्यंत काहीच उपाययोजना न केल्यामुळे येणारे पाणीही तलावाबाहेर जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व मासेमार सहकारी संस्थांनी केली आहे.या तलावाचे खोलीकरण करून तलावाच्या पाळीचे व तुडुमाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन व माहिती गावकरी, मच्छीमार सोसायटी व जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी दिली होती. यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले. त्यामुळे मासेमारी करणारे व शेतीवर आधारीत शेतकऱ्याचे मोठे हाल झाले आहे. सदर तलाव ३३ हेक्टर जमिनीत असून या तलावाच्या पाण्यापासून ५६ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत होती. मात्र आता तलावात पाणीच शिल्लक नसल्याने यावर्षी शेतीला सिंचनाची समस्या उद्भवणार आहे.साकोली तालुक्यातील बहुतेक तलाव माजी मालगुजारी तलाव आहेत. ही सर्व तलाव फार जुनी आहेत. बऱ्याच तलावातील गाळ काढणे, वेस्टवेअरची कामे, पाळ दुरुस्त करणे अशी कामे जलसंधारण विभागामार्फत करण्यात आली नाही. तलावांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक तलावांच्या पाळीची स्थिती भयावह आहे. तलावाच्या पुर्नविकासासाठी आतातरी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.उन्हाळी शेतीचा प्रश्न भेडसावणारबोदरा येथील फुटलेल्या तलावाच्या पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जात होती. मात्र यावर्षी तलावात पाणी शिल्लक नसल्याने पावसाळी व उन्हाळी धानाचे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार जलसंधारण विभागच आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी व परिसरातील नागरिकांच्या आहेत.बोदरा तलावाच्या पाळीची दुरुस्ती करण्यात यावी अशी माहिती लेखी स्वरुपात संबंधित विभागाला दोन वर्षापूर्वी दिली होती. तरीही पाळ दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाळ फुटली. त्यामुळे मच्छीपालन संस्थेचे २० लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. या तलावावर मच्छीपालन सहकारी संस्थेच्या शेकडो सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.-हेमकृष्ण दिघोरे, अध्यक्ष, नवनाथ मच्छीपालन संस्था, बोदरा.तलावाची पाळ दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सतत दोन वर्षापासून जलसंधारण विभागाला पाठपुरावा करीत होतो. मात्र अधिकाºयांचा कामचुकारपणा व निष्काळजीपणा या तलावाच्या पाळ फुटीला कारणीभूत ठरला. झालेले शेतीचे व मच्छीमार सोसायटीचे नुकसान जलसंधारण विभागाने भरून द्यावे, तसेच दोषी अधिकाºयावर योग्य ती तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा पुढचे नियोजन केले जाईल.- होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर