शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अखेर पेंढरी पुनर्वासीयांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:54 IST

पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रशासनाने घेतली दखल : पाण्याचा स्रोत शोधण्याची गरज

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.पेंढरी पुर्नवसन येथे गेला एक महिन्यापासुन पिण्याचा पाण्याचा मोठा गहन प्रश्न उपस्थित झाला होता. पिण्याचे पाणी जिथे मिळत नसणार तेथील ग्रामस्थांची मनस्थिती काय असणार? येथील ग्रामस्थ पिण्याचे पाण्यासाठी पहाटेपासूनच पाण्याचा संकलनासाठी धावपळ करायचे, या पुर्नवसन ठिकाणच्या एक ना अनेक समस्या आहेत. या सोडविण्यासाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांनी तथा लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले. परंतु सर्व पालथ्या घागरीवर पाणीच! ग्रामस्थांच्या मते टँकरद्वारे आलेले पाणी हे फक्त १५ जून पावेतो पुरवठा होणार असल्याचे गावात आलेल्या काही अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले असल्याचे सांगितले.१५ जून नंतर पुन्हा ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा शोधात जावे लागणार काय? गावात विहिर तडाला गेली, हात पंपाचे पाणी पिण्यायोग्य सहा पैकी एकाच हातपंपाचे. शासन तथा प्रशासनाने या १५ दिवसाच्या कालावधीत पेंढरी पुर्नवसन ग्रामवासींयाना मोफत पिण्याचे पाणी मिळणार अशी व्यवस्था करावी. कारण प्रत्येक कुटुंब पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. ज्या कुटुंबाची वा व्यक्तीची क्षमताच नाही त्यांच्या घरात पिण्याचे पाणी जाणार तरी कसे? असाही प्रश्न उपस्थित होतो.१५ दिवस पिण्याचे पाणी मिळणार असले तरी यासाठी ग्रामवासींयानी शासन तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. यापुढे ग्रामवासींयाना नियमित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणार का नाही? यासाठी १५ दिवसात दुसरा पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे अशा ठिकाणी अधामधात बोअरवेल मशीन लावल्यामुळे गढुळ पाणी येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई