शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:53 IST

केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.

ठळक मुद्दे४३ वर्षांची प्रतीक्षा फळाला : १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन सुरु

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील बावनथडी नदीवर १९७५ मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान वेगवर्धीत कृषीसिंचन योजनेत बावनथडी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धरण अपूर्ण राहिले. धरणाच्या लाभक्षेत्रात ७७ गावांचा समावेश आहे. धरणाचे १९९५ मध्ये नियोजन झाले. तेव्हा ११.६६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. येथे पुनर्वसन, वनविभागाची मान्यता तथा भूसंपादन प्रक्रिया रेंगाळल्याने आता प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ २०१८ मध्ये मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम तथा इतर अधिकाऱ्यांच्या चमूने आव्हान स्वीकारले. केवळ तीन वर्षात १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. धान उत्पादन करणाºया भंडारा जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. २००४ मध्ये प्रकल्पाचा समावेश केंद्रीय सिंचन यंत्रणेत करण्यात आला. परंतु दहा वर्षात केंद्र सरकारकडून १४९ कोटी रुपये प्रकल्पासाठी प्राप्त झाले. केंद्राचे २५ टक्के तर राज्याचे उर्वरीत १८५.७२ कोटी रुपये प्रकल्पाला प्राप्त झाले होते. शेती सरळ खरेदीने ३५१ हेक्टर पैकी ४२ हेक्टर शिल्लक असून १८ हेक्टर शेतीचा मोबदला देणे बाकी आहे. सुमारे १३ हजार हेक्टर पादचारी कामे करण्यात आली. आता या प्रकल्पाचा लाभ माडगी, चारगाव, ढोरवाडा, बोरी येथील शेतकºयांना होत आहे.धरणातून प्रत्यक्ष सिंचनाच्या लाभासाठी ४३ वर्ष लागले. तुमसर तालुक्यातील शेतकºयांचे प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे. तीन वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास जााण्यास मदत झाली. पाटबंधारे विभागातील अधिकारी व सहकाºयांमुळे १५ हजार ३०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे.-अरविंद गेडाम, कार्यकारी अभियंता, बावनथडी प्रकल्प.