शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:53 IST

केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.

ठळक मुद्दे४३ वर्षांची प्रतीक्षा फळाला : १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन सुरु

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील बावनथडी नदीवर १९७५ मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान वेगवर्धीत कृषीसिंचन योजनेत बावनथडी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धरण अपूर्ण राहिले. धरणाच्या लाभक्षेत्रात ७७ गावांचा समावेश आहे. धरणाचे १९९५ मध्ये नियोजन झाले. तेव्हा ११.६६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. येथे पुनर्वसन, वनविभागाची मान्यता तथा भूसंपादन प्रक्रिया रेंगाळल्याने आता प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ २०१८ मध्ये मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम तथा इतर अधिकाऱ्यांच्या चमूने आव्हान स्वीकारले. केवळ तीन वर्षात १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. धान उत्पादन करणाºया भंडारा जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. २००४ मध्ये प्रकल्पाचा समावेश केंद्रीय सिंचन यंत्रणेत करण्यात आला. परंतु दहा वर्षात केंद्र सरकारकडून १४९ कोटी रुपये प्रकल्पासाठी प्राप्त झाले. केंद्राचे २५ टक्के तर राज्याचे उर्वरीत १८५.७२ कोटी रुपये प्रकल्पाला प्राप्त झाले होते. शेती सरळ खरेदीने ३५१ हेक्टर पैकी ४२ हेक्टर शिल्लक असून १८ हेक्टर शेतीचा मोबदला देणे बाकी आहे. सुमारे १३ हजार हेक्टर पादचारी कामे करण्यात आली. आता या प्रकल्पाचा लाभ माडगी, चारगाव, ढोरवाडा, बोरी येथील शेतकºयांना होत आहे.धरणातून प्रत्यक्ष सिंचनाच्या लाभासाठी ४३ वर्ष लागले. तुमसर तालुक्यातील शेतकºयांचे प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे. तीन वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास जााण्यास मदत झाली. पाटबंधारे विभागातील अधिकारी व सहकाºयांमुळे १५ हजार ३०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे.-अरविंद गेडाम, कार्यकारी अभियंता, बावनथडी प्रकल्प.