शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामपंचायतच्या पुढाकारातून समस्या लागल्या मार्गी

By admin | Updated: July 14, 2017 00:55 IST

अड्याळचे बसस्थानक नेहमी चर्चेचा विषय बनले आहे. येथील मुख्य समस्या म्हणजे बसायला स्वच्छ जागेचा अभाव,

बसस्थानकावरील समस्यांचे प्रकरण : प्रसाधनगृहाची होणार सफाई, तातडीने मार्गावरील खड्डे बुजविलेविशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळचे बसस्थानक नेहमी चर्चेचा विषय बनले आहे. येथील मुख्य समस्या म्हणजे बसायला स्वच्छ जागेचा अभाव, महिला व पुरूष प्रसाधनगृहाची अस्वच्छता आणि बस स्थानकासमोरील खड्डे यामुळे अड्याळ ग्रामस्थ तथा प्रवासी त्रस्त झाले होते. या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे ग्रामपंचायतने त्या विषयाची गंभीरतेने दखल घेऊन बसस्थानकासमोरील खड्डे बुजविले. व महिला व पुरूष प्रसाधनगृहाची सुद्धा साफसफाई त्वरीत करण्याचे निर्देश ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच यांनी कर्मचाऱ्यांना दिले. ‘समस्याग्रस्त बसस्थानकात प्रवाशांचा जीव धोक्यात’ या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने ्रप्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर समस्यांचा निपटारा करण्यासाठी बसस्थानक परिसर गाठले. यांनतर ग्रामपंचायतने खड्डे बुजविले. दरम्यान बसस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदरी केवळ ग्रामपंचायतची की व्यवसायीकांचीही हा ही एक प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला. विशेष म्हणजे अड्याळ हे एकमेव मोठे गाव असेल की जिथे प्रवासी निवाऱ्याची पक्की इमारत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतने एसटी महामंडळाला येथे एका कर्मचाऱ्याला बसण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली आहे. येथून शेकडो विद्यार्थी बसपास काढतात. ग्रामपंचायतीने याआधी सुद्धा बसस्थानकासाठी वेळोवेळी थोडीफार मदत केली आणि त्यामुळेच प्रवासी निवाऱ्यांचा कापडी शामियाना उभा झाला, हेही एक सत्य आहे.बसस्थानकातील समस्या आणि त्याही पेक्षा अतिक्रमण याविषयी लवकरच येथील दुकानदारांना नोटीस देणार असल्याची माहिती आहे. अतिक्रमणामुळे काय काय झाले हे अड्याळवासी अनुभवून आहेत. येथील महिला प्रसाधनगृहाकडे जाण्याच्या मार्गावरून जाता येत नसल्यामुळे तो मार्ग मोकळा करून देण्याची मागणी होत आहे. सोबतच साफसफाई व प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्याकडे ग्रामपंचायतने आता लक्ष पुरविण्यावर भर देण्याचे अभिवचन दिले आहे. या प्रवासी निवाऱ्यासाठी काहीही श्रमदान केले तर काहींनी धन दान केले हे फक्त गावासाठीच यामध्ये आजपर्यंत कुठलीही राजनिती नव्हती त्यामुळेच की काय अड्याळ लाईव्ह ग्रुपचे सोशल मिडियाचे मुख्य कलीम शेख यांच्या कल्पनेचे आजही लोक कौतूक करतात. येथील उभ्या असलेल्या कापडी शामियानाला काढून दुरूस्त करण्यात येईल. प्रवाशांना बसण्याची व प्रसाधनगृहाची साफसफाई वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे मत उपसरपंच देविदास नगरे यांनी मांडले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्याने ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.