शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकाचे वाण निघाले भेसळ!; शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:52 IST

लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील निनाद गोंदोळे यांच्या एक एकर शेतात चंदू ६६ हे वाण ८०ते ९० टक्के भेसळ निघाल्याचे तालुका कृषी तक्रार निवारण समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देएकरी वीस हजारांचे नुकसान

भंडारा : अधिक उत्पन्न घेण्याकरिता शेतकरी उत्कृष्ट बियाणाची खरेदी करतो. अधिकृत कंपनी समजून ग्राहक अर्थात शेतकरी ठरलेली बियाण्याची किमत मोजतो. मात्र, यात भात/धान बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना भेसळ बियाणे विकून मालामाल होत आहेत. कंपन्यांच्या अवास्तव धोरणाने शेतकरी मात्र रसातळाला जात आहे. लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील निनाद गोंदोळे यांच्या एक एकर शेतात चंदू ६६ हे वाण ८०ते ९० टक्के भेसळ निघाल्याचे तालुका कृषी तक्रार निवारण समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.

दरवर्षी प्रत्येक हंगामात धान बियाणे भेसळ निघण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या या नियमात राहून साचेबंद धोरणाने बियाणे तयार करावे लागतात, ती प्रक्रिया काहीतरी कारणाने चुकून भेसळ बियाणे विक्रीला येतात. बियाणे विक्रीला येण्यापूर्वी या बियाणाची कृषी विभागामार्फत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या चाचण्या आवश्यक आहेत त्यांची पूर्तता करून नंतरच विकलेला येणे आवश्यक असते. मात्र, अधिक नफ्याकरिता खासगी व्यापारी कंपन्या नियमाला तिलांजली देत बियाणे भेसळ विकतात.

पालांदूर परिसरात यापूर्वीही नामवंत कंपन्यांनीसुद्धा भेसळ बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. कधीकधी अधिक कालावधीचे बियाणे कमी दिवसांत येते, तर कधी कधी कमी दिवसाचे बियाणे अधिक दिवस घेते. अशा प्रकारामुळे सुद्धा शेतकरी नुकसानीस पात्र ठरतो. दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागतो.

लाखनी तालुक्यातील जेवणाला येथील सुमारे पाच ते सहा शेतकऱ्यांना चंदू ६६ या भेसळ धान वाणाचा फटका बसलेला आहे. याच केवळ १०ते १५ टक्के धान हे चंदू ६६ या जातीचे असून इतर ८५ ते ९० टक्के धान भेसळ स्वरूपाचे तालुका कृषी अधिकारी तक्रार निवारण समितीच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले.

निनाद गोंधोळे जेवणाला यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, भात शास्त्रज्ञ गौतम श्यामकुवर कृषी संशोधन केंद्र साकोली,कृषी अधिकारी एम. के. जांभूळकर पंचायत समिती लाखनी, कृषी अधिकारी आर. आर. कोळी, कृषी निविष्ठाधारक प्रशांत गिरेपुंजे तसेच प्रभावित शेतकरी बांधव थेट बांधावर उपस्थित होते.

रामकृष्ण सीड क्रापकेअर प्रायव्हेट लिमिटेड करिमनगर तेलंगणा असे भेसळ बियाणे पुरविणाऱ्या कंपनीचे नाव असून शेतकऱ्याला ग्राहक मंचात न्याय मागण्याचा निर्देश कृषी विभागाच्या वतीने पुरविण्यात आले आहे. असाच प्रकार पालांदूर येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा घडलेला आहे.

माझ्या शेतातील चंदू ६६ या भात वाणात कृषी विभागाच्या उपस्थित झालेल्या सर्वेक्षणात ८५ ते ९० टक्के भेसळ असल्याचा निष्कर्ष देण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच माझे उत्पन्न प्रभावित झाले असून एका एकरात सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई थेट कंपनी मालकाकडून शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कोर्टकचेऱ्याची भानगड लागू नये. कोर्टात जावे लागले तर ग्राहक मंचाचा खर्चसुद्धा कंपनीने द्यावे. कृषी विभागाने तसा पाठपुरावासुद्धा करावा. नुकसान भरपाईची मर्यादा सुद्धा वाढवावी. वारंवार बेसळ बियाणे कंपनी पुरवत असल्यास तिच्यावर प्रतिबंध लादावा.

निनाद गोंदोळे, प्रभावित शेतकरी जेवनाळा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी