शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

शहरातील धोकादायक टॉवरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजीवितहानीची भीती : नागरिकांच्या तक्रारींबाबत नगरपरिषद प्रशासनाची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या विविध भागात असणारे मोबाईल टॉवर अनेक वर्षांपासून उभे आहेत. याकडे विविध कंपन्यांचे देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात अपघात होण्याची भीती आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रार करुन देखील याकडे कानाडोळा केला जात असल्याने एखादी मोठी जीवितहानीची घटना घडण्याची भीती नागरिकातून वर्तविली जात आहे.मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. गतवर्षी पर्यावरणप्रेमींसह व जागरुक नागरिकांनी पाठपुरावा करून मोबाईल टॉवर उभारणीला प्रचंड विरोध केला. मात्र हा विरोध न जुमानता टॉवरची भर घातली आहे. मेंढा (खांबतलाव) खात रोड, कस्तुरबा गांधी वार्ड, साई मंदिर रोड या भागात टॉवर उभारण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या मधोमध असलेल्या कापड बाजार चौकातील टॉवर येथे सुध्दा मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.गत दहा ते अकरा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. तरीदेखील भ्रमणध्वनीची सेवा सुरळीतपणे देताना दिसत नाहीत. टॉवर उभारणे गरजेचे आहे. परंतू टॉवर उभारतांना महत्वाच्या अटी व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. मानवी जीवांसह पशुपक्षी व पर्यावरणावर मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या घातक लहरींचा परिणाम होत असल्याची बाब सर्वज्ञात आहे. त्यामुळे असे टॉवर गावाबाहेर किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या भागात उभारणे गरजेचे आहे.या क्षेत्रात काम करणाºया अनेक खाजगी कंपन्या आपल्या सोयीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारत आहत. ज्यांच्या मालकीच्या जागेत या इमारतीत टॉवर लावले जाते त्यांना चांगला मोबदला मिळतो. मात्र त्यामुळे इतरांचा विचार न करता इमारती व जागा भाड्याने दिल्या जात आहेत. टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानूसार नगर पालीकेची परवानगी आवश्यक असते. परंतू शहरातील अनेक टॉवर हे बेकायदेशिर उभे आहेत. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत भाडे मिळते. सर्व निकषांची पूर्तता करुनच टॉवरसाठी प्रशासनाकडून अनुमती दिली जाते मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसून येत आहे. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपरिषदेबंतर्गत येत असल्याने शहरात किती टॉवर आहेत त्यांची परवानगी घेतली किंवा नाही, किती अधिकृत व किती अनाधिकृत याचे रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. प्राप्त माहितीनूसार अनाधिकृत टॉवरचीच संख्या शहरात जास्त असल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाच्या पुढाकाराची गरजनगर परिषद प्रशासनाने शहरात असणाऱ्या टॉवरची संख्या तसेच त्यांची देखभाल दुरुस्ती होत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे अनेक पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. टॉवरची संख्या वाढली असताना देखील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल