शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शहरातील धोकादायक टॉवरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजीवितहानीची भीती : नागरिकांच्या तक्रारींबाबत नगरपरिषद प्रशासनाची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या विविध भागात असणारे मोबाईल टॉवर अनेक वर्षांपासून उभे आहेत. याकडे विविध कंपन्यांचे देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात अपघात होण्याची भीती आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रार करुन देखील याकडे कानाडोळा केला जात असल्याने एखादी मोठी जीवितहानीची घटना घडण्याची भीती नागरिकातून वर्तविली जात आहे.मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. गतवर्षी पर्यावरणप्रेमींसह व जागरुक नागरिकांनी पाठपुरावा करून मोबाईल टॉवर उभारणीला प्रचंड विरोध केला. मात्र हा विरोध न जुमानता टॉवरची भर घातली आहे. मेंढा (खांबतलाव) खात रोड, कस्तुरबा गांधी वार्ड, साई मंदिर रोड या भागात टॉवर उभारण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या मधोमध असलेल्या कापड बाजार चौकातील टॉवर येथे सुध्दा मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.गत दहा ते अकरा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. तरीदेखील भ्रमणध्वनीची सेवा सुरळीतपणे देताना दिसत नाहीत. टॉवर उभारणे गरजेचे आहे. परंतू टॉवर उभारतांना महत्वाच्या अटी व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. मानवी जीवांसह पशुपक्षी व पर्यावरणावर मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या घातक लहरींचा परिणाम होत असल्याची बाब सर्वज्ञात आहे. त्यामुळे असे टॉवर गावाबाहेर किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या भागात उभारणे गरजेचे आहे.या क्षेत्रात काम करणाºया अनेक खाजगी कंपन्या आपल्या सोयीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारत आहत. ज्यांच्या मालकीच्या जागेत या इमारतीत टॉवर लावले जाते त्यांना चांगला मोबदला मिळतो. मात्र त्यामुळे इतरांचा विचार न करता इमारती व जागा भाड्याने दिल्या जात आहेत. टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानूसार नगर पालीकेची परवानगी आवश्यक असते. परंतू शहरातील अनेक टॉवर हे बेकायदेशिर उभे आहेत. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत भाडे मिळते. सर्व निकषांची पूर्तता करुनच टॉवरसाठी प्रशासनाकडून अनुमती दिली जाते मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसून येत आहे. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपरिषदेबंतर्गत येत असल्याने शहरात किती टॉवर आहेत त्यांची परवानगी घेतली किंवा नाही, किती अधिकृत व किती अनाधिकृत याचे रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. प्राप्त माहितीनूसार अनाधिकृत टॉवरचीच संख्या शहरात जास्त असल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाच्या पुढाकाराची गरजनगर परिषद प्रशासनाने शहरात असणाऱ्या टॉवरची संख्या तसेच त्यांची देखभाल दुरुस्ती होत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे अनेक पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. टॉवरची संख्या वाढली असताना देखील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल