शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे

पालोरा (चौ) : गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेवून एक आदर्श समोर ठेवला आहे. पदाधिकाऱ्यांपासून विद्यार्थीही स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व कळले नाही. गावागावात घाणच घाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही स्वच्छतेबाबद कुणीही पुढाकार घेत नाही. मात्र पवनी तालुक्यातील मोखारा हा गाव जवळपास १,२०० लोकवस्तीचा आहे. हा गाव स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात पुढे आहे. दररोज श्रम दानातून गावातील घाण स्वच्छ करणे हे त्यांचे नित्यक्रम झाले आहे. यात येथील लालचंद नखाते यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. पूर्वी हा गाव व्यसनाधीन होता. गावात घाणच-घाण पाहायला मिळत होती. तेव्हा लालचंद नखाते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रथम गावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. उच्च शिक्षित असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता गावाचा विकास करणे महत्वाचे ठरविले. स्वता हाता झाडू, पावळा, घमेला घेवून गाव स्वच्छतेला सुरुवात केली. जे नागरिक रस्त्यावर शौचालयाकरिता बसतात, कचरा रस्त्यावर टाकतात ते स्वच्छ करण्याचे काम सुरु केले. उन्हाळा पावसाळा, किंवा हिवाळा असो कशालाही न घाबरता लालचंद यांचे काम नित्यक्रमाचे ठरले होते. आजही पहाटेपासून संपुर्ण गावातील कचरा उचलण्याचे काम करित आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दररोज सांयकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते. आठवड्यातून एकदा संपूर्ण गावातील रस्ते पाण्याने स्वच्छ करुन प्रभात फेरी काढली जाते. संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात वृक्षलागवड केली जाते. प्रशासनाच्या योजनेची वाट न पाहता प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करणे याबाबद गावकऱ्यांनी मोलाचा वाटा घेतला आहे. लालचंद मागील ३० वर्षापासून गावात स्वच्छता करीत आहे. वृक्षारोपण व स्वच्छतेबद्दल गावकऱ्यांना जागृत करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. आज हा गाव स्वच्छतेच्या बाबतील तालुक्यात अग्रेसर आहे. श्रमदानातून गावकरी गाव स्वच्छ करीत आहेत. गावातील बरेच नागरिक व्यसनापासून दूर झाले आहेत. गाव जरी लहान असला तरी शासनाच्या प्रत्येक योजना गावात सर्व मिळवून राबवीत असतात. लालचंदचा पुढाकार त्याचे कर्तव्य तालुक्यात चर्चचा विषय ठरत आहे. त्यांना प्रसिध्द आणि पद या पासून ते कोसोदूर आहेत. त्यांचे अनुकरण दुसऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र या संदर्भात कुणालाही वेळ दिसत नाही. अनेकांचे टोमने येकून शुध्दा लालचंदचा हा नित्यक्रम आजही सुरु आहे. या बाबद संबंधित प्रशासनाचे याची दखल घ्यायला पाहिजे मात्र असे झाले नाही हि एक खंताची बाब म्हणावी लागेल. (वार्ताहर)