शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे

पालोरा (चौ) : गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेवून एक आदर्श समोर ठेवला आहे. पदाधिकाऱ्यांपासून विद्यार्थीही स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व कळले नाही. गावागावात घाणच घाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही स्वच्छतेबाबद कुणीही पुढाकार घेत नाही. मात्र पवनी तालुक्यातील मोखारा हा गाव जवळपास १,२०० लोकवस्तीचा आहे. हा गाव स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात पुढे आहे. दररोज श्रम दानातून गावातील घाण स्वच्छ करणे हे त्यांचे नित्यक्रम झाले आहे. यात येथील लालचंद नखाते यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. पूर्वी हा गाव व्यसनाधीन होता. गावात घाणच-घाण पाहायला मिळत होती. तेव्हा लालचंद नखाते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रथम गावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. उच्च शिक्षित असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता गावाचा विकास करणे महत्वाचे ठरविले. स्वता हाता झाडू, पावळा, घमेला घेवून गाव स्वच्छतेला सुरुवात केली. जे नागरिक रस्त्यावर शौचालयाकरिता बसतात, कचरा रस्त्यावर टाकतात ते स्वच्छ करण्याचे काम सुरु केले. उन्हाळा पावसाळा, किंवा हिवाळा असो कशालाही न घाबरता लालचंद यांचे काम नित्यक्रमाचे ठरले होते. आजही पहाटेपासून संपुर्ण गावातील कचरा उचलण्याचे काम करित आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दररोज सांयकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते. आठवड्यातून एकदा संपूर्ण गावातील रस्ते पाण्याने स्वच्छ करुन प्रभात फेरी काढली जाते. संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात वृक्षलागवड केली जाते. प्रशासनाच्या योजनेची वाट न पाहता प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करणे याबाबद गावकऱ्यांनी मोलाचा वाटा घेतला आहे. लालचंद मागील ३० वर्षापासून गावात स्वच्छता करीत आहे. वृक्षारोपण व स्वच्छतेबद्दल गावकऱ्यांना जागृत करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. आज हा गाव स्वच्छतेच्या बाबतील तालुक्यात अग्रेसर आहे. श्रमदानातून गावकरी गाव स्वच्छ करीत आहेत. गावातील बरेच नागरिक व्यसनापासून दूर झाले आहेत. गाव जरी लहान असला तरी शासनाच्या प्रत्येक योजना गावात सर्व मिळवून राबवीत असतात. लालचंदचा पुढाकार त्याचे कर्तव्य तालुक्यात चर्चचा विषय ठरत आहे. त्यांना प्रसिध्द आणि पद या पासून ते कोसोदूर आहेत. त्यांचे अनुकरण दुसऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र या संदर्भात कुणालाही वेळ दिसत नाही. अनेकांचे टोमने येकून शुध्दा लालचंदचा हा नित्यक्रम आजही सुरु आहे. या बाबद संबंधित प्रशासनाचे याची दखल घ्यायला पाहिजे मात्र असे झाले नाही हि एक खंताची बाब म्हणावी लागेल. (वार्ताहर)