शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पावणेचार कोटींच्या निधी वितरणाला प्रशासनाकडून होतेय दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST

भंडारा- राज्यातील १९ जिल्ह्यांतील २१ सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या ४ ते ५ ...

भंडारा- राज्यातील १९ जिल्ह्यांतील २१ सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. या थकीत वेतनासाठी शासनाने ३ कोटी ७५ लाखांचा निधीही मंजूर केला. या निधी वितरणाचे १६ जुलै २०२१ ला शासन परिपत्रकही जारी केले होते, मात्र तीन आठवडे उलटूनही हा निधी प्राप्त झालेला नाही. येत्या आठवड्यात या निधीला मुहूर्त न मिळाल्यास राज्यातील सैनिकी शाळेतील शिक्षक उपोषणासह आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

वेतनाचा सरसकट निधी वर्षाच्या सुरुवातीलाच ६० टक्क्यांपर्यंत वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत होता. कोरोनाच्या नावाखाली वित्त विभागाकडून दर महिन्याला केवळ ५ ते १० टक्के निधी देण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली विनाकारण अडवणूक केली जात आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी एक महिन्याची मागणी १ कोटी ९० लाख ९६ हजार असताना आता केवळ २५ टक्के निधी अर्थात ३ कोटी ७५ लाख निधी मंजूर केला आहे. सद्यस्थितीत राज्यातील सैनिकी शाळांमधील कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ या ५ महिन्यांचा पगार थकीत आहे. या दरम्यान विम्याचेही हप्ते थकीत असल्यामुळे सुरक्षा कवच नाही. तरी शालेय शिक्षण विभागाने यात लक्ष घालून थकीत वेतनासाठी लागणारा ३ कोटी ७५ लाख निधीचा मार्ग मोकळा करावा. कर्मचाऱ्यांचा अनियमित वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष २२०२-एच ९७३ चे ‘प्लॅन टू नॉन प्लॅन’मध्ये वर्ग होणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

शासन परिपत्रकातील मुद्दा क्र. ३ तत्काळ वगळावा

सैनिकी शाळेमध्ये सुमारे ८ ते १० हजार आदिवासी विद्यार्थी उत्तम प्रकारचे शिक्षण घेत असताना शासनाने २४ एप्रिल २०२० च्या शासन परिपत्रकानुसार ५ वीचे वर्ग बंद केले. पण यात जोपर्यंत या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत संबंधित लेखाशीर्षामधून नियमित वेतन देण्याचे नमूद केले होते. त्यानंतर पुन्हा आदिवासी विकास विभागाने १६ जुलै २०२१ ला शासन परिपत्रक जारी करून संभ्रमावस्था वाढवली. त्यात मुद्दा क्र. ३ मध्ये ‘विभागाने मागील वर्षापासून स्वतंत्र वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून ५ वी व ६ वीवरील शिक्षकांचे वेतन यामधून खर्ची टाकू नये’ असा उल्लेख केला. या निर्णयाचा शिक्षकांनी जाहीर निषेध केला असून या परिपत्रकातील मुद्दा क्र. ३ तत्काळ वगळावा, यासाठी शासन व प्रशासन स्तरावर संस्थाचालक, शिक्षक संघटना व आदिवासी संघटनांकडून दबाव गट निर्माण केला जात आहे. आदिवासी विकास विभागाचे या सैनिकी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या या चांगल्या योजनेला बंद करण्याचे फार मोठे षड्यंत्र दिसून येत आहे.

कोट बॉक्स

शासनाने राज्यातील आदिवासी क्षेत्रातील उपाययोजना, सैनिकी शाळा आदिवासी तुकडी व येथील विद्यार्थी व शिक्षकांवर अन्याय करण्याचे व अनुदानित शिक्षण संपवण्याचे धोरण स्वीकारले आहे त्याचा मी निषेध करतो. वेळ पडल्यास शिक्षकांचे वेतन व्याजासहित शासनाकडून वसूल करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. शिक्षकांच्या वेतनाची समस्या तत्काळ न सुटल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- राजेंद्र झाडे, राज्य उपाध्यक्ष

शिक्षक भारती शासनमान्य संघटना, महाराष्ट्र राज्य नागपूर विभाग

कोट बॉक्स

राज्यात व देशात कोविड-१९ काळ सुरू झाला तेव्हापासून अनियमित वेतन सुरू आहे. मागच्या पाच महिन्यांपासून विनावेतन काम करण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे. मुलाबाळांचे पालन-पोषण व आपल्या नोकरीची जबाबदारी सांभाळत असताना विनावेतन जगावे की मरावे, हा यक्षप्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत. शिक्षक व आदिवासी विद्यार्थ्यांबद्दल एवढी उदासीनता असेल तर आम्हास भीक मागण्याची परवानगी द्यावी, ही विनंती.

जयंता लाडे, शिक्षक, सैनिकी विद्यालय, लाखनी जिल्हा भंडारा