शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:21 IST

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत पुन्हा ज्वर चढू लागला आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था शून्य : नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा पुढाकार

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत पुन्हा ज्वर चढू लागला आहे. भंडारा नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे शहरातील त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. परिणामी रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात केली आहे.वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठाने झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर स्वरूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकाने थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्यातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली आहे. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. परिणामी अपघाताला आमंत्रण तर मिळतेच याशिवाय वाहतुकीच्या कोंडीला समोरे जावे लागते. दीड लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाची समस्या पालिका प्रशासनासाठी गंभीर समस्या ठरली आहे. दर दोन वर्षांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत असली तरी तरी शेकडो लघु व्यावसायिकांची दुकाने उजाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही. त्यातही श्रीमंतांना वगळून गरिबांची दुकाने तोडली जातात, असा आरोप कायम आहे. अतिक्रमण करणे हा गुन्हा असला तरी रोजगारअभावी पोट भरणे कसे शक्य आहे, याचे तारतम्य जुळणे आवश्यक आहे.अशी आहे नोटीसभंडारा नगर पालिका तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमणधारकांना वेगवेगळ्या तारखेला नोटीस बजावण्यात आलेले आहेत. यात भंडारा-तुमसर राज्यमार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण नोटीस मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत काढावे, अन्यथा मुंबई महामार्ग अधिनियम कलम २१ अन्वये व महाराष्टÑ नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ व १८९ अंतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे करण्यात आल्यास त्याचा खर्चही अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही बजावले आहे.पार्किंग नसलेले शहरभंडारा शहर कदाचित महाराष्ट्रातील पहिले पार्किंग नसलेले जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असावे. पार्किंगची गरज कुणालाही कशी? कळली नसावी, ही नवलाची बाब आहे. जिल्हा मुख्यालय, शाळा, महाविद्यालये, सर्वच बॅकांच्या शाखा व एटीएम केंद्र भंडारा शहरात आहेत. केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, सात पेट्रोलपंप, मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल्स, सार्वजनिकसह खाजगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क यासह शकेडो पतसंस्था व बरीच कार्यालये व शेकडो व्यापारी प्रतिष्ठाने व आस्थापना आहेत. मात्र, शहरात कुठेही र्पाकिंगची व्यवस्था नाही.अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. पोलीस दलाचे सहकार्य मिळताच संयुक्तपणे मुख्य मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येईल.- अनिल अढागळे, मुख्याधिकारी, नगरपालिका, भंडारा