शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांचे प्रवेश ‘वेटिंग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:29 IST

मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : मोफत शिक्षण नव्हे, बोगस शिक्षण प्रणाली

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.शिक्षण हक्क कायद्याने ६ ते १४ वर्ष वायोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी विशिष्ट घटकांना शिक्षण असे नसून सरसकट राज्यातील सर्व मुलांना शिक्षण असे आहे. शासनाने सुुरु केलेल्या व शासनाच्या अनुदानावर असलेल्या शाळा शिक्षण देण्याचे काम करतात. परंतु पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासन कोणतेही अनुदान देत नाही. त्यामुळे मुलांच्या पालकांकडून शुल्क वसुल केले जाते. सर्वसामान्यांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकता यावे यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढली. अर्ज दाखल करणारे पात्र आहेत म्हणून अर्ज भरतात. मात्र केवळ २५ टक्के मुलांना प्रवेश देण्यात येतो. शिक्षणासाठी मोफत आणि सक्तीचा कायदा असताना २५ टक्के मुलांनाच का प्रवेश असा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत ही प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.अंतराच्या निकषाचा घोळनामवंत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी दिवसेंदिवस नवीन शक्कल लढविली जाते. जिल्ह्यातील अनेक शाळा लोकवस्तींपासून लांब अंतरावर आहे. अनेक शाळेत मुलांना एक किमीच्या आत अंतराचा निकष प्रवेशासाठी आहे. त्याचबरोबर शाळेपासून लांब वास्तव्य असलेल्या अनेक मुलांना एक किमी अंतराच्या निकषावर प्रवेश मिळाला. याला आरटीई अंतर्गत राबविण्यात येणारी सदोष प्रवेश प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.अधिकारशाही वाढलीआरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया बालकांच्या शुल्क प्रतिपूर्तीच्या स्वरुपात शाळांना देण्यात येते. शाळांना मिळणारा हा पैसा शिक्षण विभागाच्या डोळ्यात भरत आहे. शिक्षण देण्याच्या मोबदल्यात मिळणारा पैसा मिळविण्यासाठी शाळांना त्रास सहन करावा लागतो. प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येणाºया रकमेवर आता अधिकारशाहीचा डोळा आहे. ऐनकेन कारणाने त्यांना वेठीस धरले जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण