शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्ह्यात दाेन लाख ८० हजार व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल ...

भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल दाेन लाख ७९ हजार ८७५ व्यक्तींचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. चाचणीच्या तुलनेत आतापर्यंत १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲन्टिजन चाचणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा आकडाही वाढत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत दिलासादायक बाब म्हणजे काेराेना चाचण्यांच्या तुलनेत केवळ १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळत आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात ही टक्केवारी दहाच्याही आत हाेती; मात्र गत दाेन महिन्यांपासून काेराेना संसर्ग वाढल्याने टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मार्च २०२० पासून काेराेना चाचण्यांना सुरुवात झाली आतापर्यंत तीन लाख २९ हजार ५४८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ५७ हजार ८९०, ॲन्टिजन २ लाख ७१ हजार ३७२ आणि टीआरयू- एनएटी २८६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सुरुवातीच्या काळात अनेकांनी चाचण्यांची धास्ती घेतली हाेती. पाॅझिटिव्ह आलाे तर काय? असा प्रश्न निर्माण झाला हाेता. गत दाेन महिन्यात काेराेना संसर्ग वाढल्याने सर्दी पडसा झालेले आणि बाहेरगावाहून आलेले व्यक्तीही तत्काळ काेराेना चाचणी करून घेत असल्याचे दिसत आहे. अलीकडे आरटीपीसीआर चाचण्या कमी प्रमाणात करण्यात येत असून, ॲन्टिजन चाचण्यावर भर आहे. अनेक जण एचआरसीटी स्कॅन करून आपला स्काेर पाहत आहे. चाचण्यांच्या तुलनेत पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी असणे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

बाॅक्स

गुरुवारी ३४ मृत्यू १११० पाॅझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात गुरुवारी ३४ जणांचा काेराेनाने मृत्यू तर १११० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ३४ मृत्यूमध्ये भंडारा तालुक्यातील १६, तुमसर आणि पवनी येथे प्रत्येकी ३ साकाेलीत सहा, लाखनी पाच, माेहाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर १११० पाॅझिटिव्ह व्यक्तींमध्ये भंडारा तालुक्यातील ४०५, माेहाडी ६३, तुमसर १५३, पवनी १६८, लाखनी ५७, साकाेली २१५ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तर ८१७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १५ हजार ९४०, माेहाडी ३१५२, तुमसर ४६९७, पवनी ४३७६, लाखनी ४१०७, साकाेली ३५७०, लाखांदूर १९५१ व्यक्तींचा समावेश आहे. तर ८१७ मृत्यूमध्ये भंडारा ४०२, माेहाडी ७४, तुमसर ९०, पवनी ८६, लाखनी ६१, साकाेली ६७, लाखांदूर ३७ व्यक्तींचा समावेश आहे.