शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अबब! भेंडी पाच रुपये किलो, विकता विकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

पालांदूर : कोरोनाचे संकट गडद असल्याने बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार, रविवारच्या दिवशी बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे ...

पालांदूर : कोरोनाचे संकट गडद असल्याने बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार, रविवारच्या दिवशी बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नसल्याने भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले आहेत. भेंडी पाच रुपये किलोने विकता विकेना झाली आहे. ग्राहकही दराविषयी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शेतकरी मात्र तुटला आहे.

चूलबंद खोऱ्यात सदाबहार भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटलेली आहे.

पालांदूर चूलबंद खोऱ्यात सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी अगदी सकाळपासूनच बाजारपेठ फुललेली असते. शेजारील जिल्ह्यातील व्यापारी पालांदूर येथील बाजारपेठेत हजेरी लावतो. भाजीपाल्यासोबतच इतरही वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ असते. परंतु शनिवार दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालांदूरची बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कायम आहे.

कृषी विभागाच्या व बीटीबी सब्जी मंडीच्या प्रेरणेने बागायतदार प्रगतशील भाजीपाल्याची शेती करत आहेत. भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांचे मळे ताजेतवाने आहेत. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे २०० हेक्‍टरवर भाजीपाल्याची शेती नियोजित आहे. यात पालांदूर येथे सुमारे ३० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड आहे. पालांदूर, मऱ्हेगाव, पाथरी, नरव्हा, वाकल, ढिवरखेडा, आदी गावात भाजीपाल्याची शेती बारमाही पिकविली जाते. पावसाने उसंत घेतली असून मोजकाच पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात भरीव वाढ आहे. उत्पादित मालाला बाहेर अपेक्षित निर्यात नसल्याने भाव पडलेले आहेत. शेतकऱ्याचा खर्चही निघणे कठीण आहे.

चवडी, भेंडी, वांगे, काकडी, दोडका, लवकी आदी भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत.

अर्धा एकर जागेत भेंडीची लागवड केलेली आहे. आणखीही भाजीपाल्याची पिके लावलेली आहेत. दररोजची भेंडी तोडली जाते. परंतु, दर पाच रुपये किलो असूनही विकत नसल्याने समस्या उभी झाली आहे.

कोट

मजुरीचे दर, कीटकनाशक, खते यांचे नियोजन आवाक्याबाहेर होत आहे. शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याने व दर अत्यल्प असल्याने भाजीपाला काढणीसुद्धा परवडत नाही.

नीतेश भुसारी, बागायतदार, पालांदूर.

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढलेले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाल्याकडे वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने भाव अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला भाव बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात भाव वाढण्याची शक्‍यता अधिक आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा.