शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अबब! भेंडी पाच रुपये किलो, विकता विकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

पालांदूर : कोरोनाचे संकट गडद असल्याने बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार, रविवारच्या दिवशी बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे ...

पालांदूर : कोरोनाचे संकट गडद असल्याने बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार, रविवारच्या दिवशी बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नसल्याने भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले आहेत. भेंडी पाच रुपये किलोने विकता विकेना झाली आहे. ग्राहकही दराविषयी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शेतकरी मात्र तुटला आहे.

चूलबंद खोऱ्यात सदाबहार भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटलेली आहे.

पालांदूर चूलबंद खोऱ्यात सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी अगदी सकाळपासूनच बाजारपेठ फुललेली असते. शेजारील जिल्ह्यातील व्यापारी पालांदूर येथील बाजारपेठेत हजेरी लावतो. भाजीपाल्यासोबतच इतरही वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ असते. परंतु शनिवार दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालांदूरची बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कायम आहे.

कृषी विभागाच्या व बीटीबी सब्जी मंडीच्या प्रेरणेने बागायतदार प्रगतशील भाजीपाल्याची शेती करत आहेत. भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांचे मळे ताजेतवाने आहेत. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे २०० हेक्‍टरवर भाजीपाल्याची शेती नियोजित आहे. यात पालांदूर येथे सुमारे ३० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड आहे. पालांदूर, मऱ्हेगाव, पाथरी, नरव्हा, वाकल, ढिवरखेडा, आदी गावात भाजीपाल्याची शेती बारमाही पिकविली जाते. पावसाने उसंत घेतली असून मोजकाच पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात भरीव वाढ आहे. उत्पादित मालाला बाहेर अपेक्षित निर्यात नसल्याने भाव पडलेले आहेत. शेतकऱ्याचा खर्चही निघणे कठीण आहे.

चवडी, भेंडी, वांगे, काकडी, दोडका, लवकी आदी भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत.

अर्धा एकर जागेत भेंडीची लागवड केलेली आहे. आणखीही भाजीपाल्याची पिके लावलेली आहेत. दररोजची भेंडी तोडली जाते. परंतु, दर पाच रुपये किलो असूनही विकत नसल्याने समस्या उभी झाली आहे.

कोट

मजुरीचे दर, कीटकनाशक, खते यांचे नियोजन आवाक्याबाहेर होत आहे. शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याने व दर अत्यल्प असल्याने भाजीपाला काढणीसुद्धा परवडत नाही.

नीतेश भुसारी, बागायतदार, पालांदूर.

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढलेले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाल्याकडे वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने भाव अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला भाव बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात भाव वाढण्याची शक्‍यता अधिक आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा.