शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

९५,०८२ सभासदांना कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:45 IST

भंडारा जिल्हा सहकारी बँकेशी ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्नित असून सर्व संस्थांच्या १ लाख ७० हजार ४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५ हजार ८२ सभासदांना कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देसुनिल फुंडे : जिल्हा बँकेचे कर्ज वाटप सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्हा सहकारी बँकेशी ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्नित असून सर्व संस्थांच्या १ लाख ७० हजार ४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५ हजार ८२ सभासदांना कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली.यावेळी ते म्हणाले, जिल्हा बँकेमार्फत सर्व सभासदांना सहकारी संस्थांच्या मार्फतीने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. संस्थेने कर्जाचे अर्ज बँकेत सादर केल्यानंतर छानणी करून सभासदाच्या सीसी लिमिट खात्यामध्ये मंजूर रक्कम जमा करण्यात येते. प्रत्येक सभासदाचे खाते शासकीय आदेशानुसार आधार व एटीएम कार्डशी जोडण्यात आले आहे.मंजूर रकमेपैकी दोन टक्के रक्कम शासकीय निर्देशानुसार सक्तीच्या पिकविमा प्रिमियमसाठी शिल्लक ठेऊन ऊर्वरीत सर्व रक्कम सभासद एटीएम कार्डद्वारे केव्हाही काढू शकतात. यात कोणतीही अडचण नसून या व्यतिरिक्त कोणतीही कपात करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जवाटप योजनेत कोणताही त्रास नसून कोणतीही जाचक अट नाही. संस्थेचे सभासद व्हा, सातबारा आणा आणि कर्ज घ्या, एवढी सोपी पध्दत इतर कोणत्याही बँकेत नसल्याचे त्यांनी सांगितले.पिकविमा ही शासनाची सक्तीची योजना आहे. त्यात बँकेला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. शेतकºयांनीच लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाच्या माध्यमातून सदर नियम शिथील करून घेणे योग्य राहील. जिल्हा बँकेने मागील आमसभेत सवार्नुमते ठराव मंजूर करून प्रधानमंत्री पीकविमा योजना ही शासनाची योजना असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सक्तीची न करता ऐच्छिक करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने शासनाकडे केली. परंतु शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय आला आहे.शेतकऱ्यांना मिळालेल्या १ लाख रुपयांपैकी दोन टक्के पिकविमा प्रिमियमची रक्कम बाजुला काढून ऊर्वरीत रक्कम प्रत्यक्ष सभासदाच्या सीसी लिमिट खात्याला जमा करण्यात येते. जेणेकरून एटीएममधून केव्हाही शेतकरी रक्कम काढू शकला पाहिजे. या हेतुने बँकेने ही प्रणाली विकसीत केली आहे. चालु हंगामात १० मेपर्यंत बँकेने १६ हजार सभासदांना ८० कोटी रूपयाचे पिककर्ज वाटप केल्याचेही फुंडे यांनी सांगितले.