शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

९ लाखांचे चुकारे अडले

By admin | Updated: August 10, 2014 22:50 IST

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले.

२दिघोरी (मोठी) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले. मात्र दिघोरी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी आधारहीन केंद्र ठरत आहेत. ४५ दिवसांपासून २९ लक्ष रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक संकटात गुरफटत चालला आहे.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे खरेदी संस्थेमार्फत उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रात १६ जून २०१४ ते जुलैपर्यंत २ हजार २८४ क्विंटल धान १३१० रुपये दराने खरेदी करण्यात आले. त्याचे एकूण २९ लक्ष ९२ हजार ४० रुपये मागील दीड महिन्यांपासून धान खरेदी केंद्राकडे थकीत असल्याची माहिती आहे. त्याचा परतावा अजूनही झालेला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खऱ्या अर्थाने उन्हाळी धान खरेदी केंद्र हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे गरजेचे असते. मात्र शासन, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे सदर खान खरेदी केंद्र हे १६ जून रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास ४५ दिवस धान स्वत:चे घरी भरुन ठेवावे लागले. त्यानंतर धान खरेदी सुरू झाल्यामुळे विकलेले धान ४५ दिवसपर्यंत केंद्रात राहिले. एकूण ९० दिवसांपासून शेतकऱ्याला चुकाऱ्याविना राहावे लागले. नियोजनाचा अभावामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.दिघोरी मोठी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने अनेकदा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली, मात्र अजूनपर्यंत त्यांच्या निवेदनावर संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचे चुकारे अडवून ठेवण्यात आले आहे. शेतकरी मंडळाने निर्णय घेतला आहे की, दि. २० आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण चुकारे न मिळाल्यास दि. २१ आॅगस्टपासून जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. (वार्ताहर)