शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

९ लाखांचे चुकारे अडले

By admin | Updated: August 10, 2014 22:50 IST

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले.

२दिघोरी (मोठी) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले. मात्र दिघोरी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी आधारहीन केंद्र ठरत आहेत. ४५ दिवसांपासून २९ लक्ष रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक संकटात गुरफटत चालला आहे.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे खरेदी संस्थेमार्फत उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रात १६ जून २०१४ ते जुलैपर्यंत २ हजार २८४ क्विंटल धान १३१० रुपये दराने खरेदी करण्यात आले. त्याचे एकूण २९ लक्ष ९२ हजार ४० रुपये मागील दीड महिन्यांपासून धान खरेदी केंद्राकडे थकीत असल्याची माहिती आहे. त्याचा परतावा अजूनही झालेला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खऱ्या अर्थाने उन्हाळी धान खरेदी केंद्र हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे गरजेचे असते. मात्र शासन, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे सदर खान खरेदी केंद्र हे १६ जून रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास ४५ दिवस धान स्वत:चे घरी भरुन ठेवावे लागले. त्यानंतर धान खरेदी सुरू झाल्यामुळे विकलेले धान ४५ दिवसपर्यंत केंद्रात राहिले. एकूण ९० दिवसांपासून शेतकऱ्याला चुकाऱ्याविना राहावे लागले. नियोजनाचा अभावामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.दिघोरी मोठी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने अनेकदा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली, मात्र अजूनपर्यंत त्यांच्या निवेदनावर संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचे चुकारे अडवून ठेवण्यात आले आहे. शेतकरी मंडळाने निर्णय घेतला आहे की, दि. २० आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण चुकारे न मिळाल्यास दि. २१ आॅगस्टपासून जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. (वार्ताहर)