शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

जलयुक्त शिवारची ८६ गावे ‘वॉटर न्युट्रल’

By admin | Updated: April 21, 2017 00:39 IST

महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

सातही तालुक्यातील गावांचा समावेश : तर सिंचनक्षेत्रात होणार वाढभंडारा : महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ८६ गावांपैकी ८६ गावे शंभर टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये एकूण ८६ गावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुका-१५, तुमसर-१९, मोहाडी-१५, पवनी-१२, लाखांदूर-६, साकोली-१० व लाखनी ९ अशा ८६ गावांचा समावेश होता. या गावात एकूण प्रस्तावित १३७० कामांपैकी १११९ कामे पूर्ण झाली आहेत.शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युर्ट्रल टक्केवारी होय. प्रकल्प आराखड्यानुसार सन २०१५-१६ अंतर्गत निवडलेल्या गावांपैकी वॉटर न्युट्रल टक्केवारीनुसार ८६ पैकी ८६ गावे शंभर टक्के "वॉटर न्युट्रल" झालेली आहेत. शंभर टक्के वॉटर न्युट्रल झालेली गावे तालुकानिहाय भंडारा-माटोरा, कवलेवाडा, पलाडी, गोलेवाडी, इटगाव, मानेगाव, नवरगाव, खुर्शीपार, गराडा बु., गराडा खु., मंडणगाव, सिल्ली, मकरधोकडा, खमारी बु., व मांडवी. मोहाडी- मोहगाव, बच्छेरा, टांगा, देवाडा बु., नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव (क), कांद्री, शिवणी, खैरलांजी, बोरी (क), करडी, उसर्रा. तुमसर- गर्रा बघेडा, दावेझरी (सी), आसलपाणी, मेहगाव, साखळी, चिखला, कोष्टी, खापाखुर्द, गोंडीटोला, पवनारा, गोबरवाही, पवनारखारी, सितासावंगी, कार्ली, रोंघा, आलेसूर, लेंडेझरी, नवरगाव, येरली. पवनी- मिन्सी, पन्नासी, भिकारमिन्सी, शेगाव, चकारा, सुरबोडी, चिचाळ, अड्याळ, कमकाझरी, तिर्री, कलेवाडा, खैरी. साकोली- सातलवाडा, रेंगेपार, सालेबर्डी, जांभळी, मालूटोला, उसगाव, पार्थी, बरडकिन्ही, सेंदुरवाफा, पळसगाव. लाखनी- मोरगाव, खैरी, पिंपळगाव, सिपेवाडा, ढिवरखेडा, मेंढा/भूगाव, केसलवाडा, राजेगाव, झरप. लाखांदूर- तावशी, टेंभरी, कुडेगाव, तई बु., आसोला व इटान अशा ८६ गावांचा समावेश आहे. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड करण्यात आली असून या गावात २३७९ कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अनेक कामांना सुरुवात झाली असून ते प्रगतीपथावर आहे. जलयुक्त शिवारमुळे गावांच्या सिंचन क्षमतेत निश्चितच वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)