शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

तुमसर तालुक्यातील ८५० आदिवासी कुटुंब भूमिहीन

By admin | Updated: October 7, 2014 23:28 IST

शासनाच्या नियमानुसार आठ मुद्यांपैकी सात मुद्यांची पूर्तता शासनाने केली. परंतु पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख एक लाख रक्कम अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मिळाली नाही. शंभर टक्के आदिवासी गाव

व्यथा आदिवासींची : मोबदल्यापासून वंचिततुमसर : शासनाच्या नियमानुसार आठ मुद्यांपैकी सात मुद्यांची पूर्तता शासनाने केली. परंतु पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख एक लाख रक्कम अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मिळाली नाही. शंभर टक्के आदिवासी गाव कमकासूर व सुसुरडोह येथील ८५० कुटुंब भूमिहीन झाली आहेत. या उध्दवस्त कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप येथील नागरिकांनी लावला आहे. सुसुरडोह तथा कमकासूर ही गावे बावनथडी प्रकल्पगात सन १९८२-८३ मध्ये समाविष्ट करण्यात आले. शंभर टक्के आदिवासी या गावांचे पुनर्वसन गर्रा बघेडा येथे नवीन गावठानात करण्यात आले. पुनर्वसन होऊन तीन वर्षे झाली तरी पर्यायी शेतजमिनीऐवजी एक लाख रोख रक्कम शासनाने दिली नाही. २१ फेब्रुवारी २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांनी सभा घेऊन आठ दिवसात रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. २८ आॅगस्ट २०१४ ला भंडारा येथे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधींची पुनर्वसन अधिकारी यांच्यात चर्चा होऊन गावाला भेट देण्याचे ठरले होते. परंतु आजपर्यंत कोणताच अधिकारी गावाकडे फिरकले नाहीत.प्रकल्पग्रस्तांकडे दोन ते ७० एकर शेती शेतकऱ्यांकडे होती. शासनाने जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला. परंतु या मोबदल्यात पुनर्वसन स्थळी शेती विकत घेता येत नाही. शासनाने प्रती कुटुंब २.५० एकर शेती देण्याची मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा कायदा येथे पायदळी तुडवला जात आहे. आदिवासींना येथे भूमीहीन करण्यात आले आहे. शासनाने केवळ ३५ हजार एकर या भावाने शेतीचा मोबदला दिला आहे.सन २००६-२००७ मध्ये काही कुटुंबांना ओटे व देवघरे यांच्याकरिता ५० हजार देण्याचे आश्वासन दिले होते. ती रक्कम अजून दिली नाही. एका घरकुल बांधकामाकरिता ६८,५०० रक्कम देते. २२७ भूखंड घराकरिता प्रत्यक्ष दिले असनू २२८ भूखंड दिल्याचे अधिकारी सांगत आहेत. नियमानुसार २० टक्के अतिरिक्त भूखंड दिले नााही. प्रकल्पग्रस्त कमकासूर व सुसुरडोह येथील कुटुंबाचा बीपीएल यादीत नावेच नाहीत. येथील अनेक कुटुंब स्थलांतरीत जीवन जगून उपजिवेकेकरिता इतरत्र गेल आहेत. १८ नागरिक सुविधांची येथे पूर्तता शसनाने केली नाही. वाढीव कुटुंबांना येथे भूखंड दिले नाही. दि. ९ मे २०१२ ला जिल्हाधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता यांनी पुनर्वसनस्थळी घरांसमोर खोलगट भागात मुरुम टाकून देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. आधी पुनर्वसन व नंतर धरण या नियमाला येथे हरताळ फासला गेला आहे. कागदोपत्री येथे अधिकाऱ्यांनी सर्व निपटारा केल्याचे प्रत्यक्ष पुनर्वसनस्थळी भेट दिल् यावर दिसून येते. परंतु मांजरीच्या गळ्यात कोण घंटी बांधणार अश्ी येथील स्थिती आहे. या सर्व मूलभूत समस्यांचा निपटारा करण्याची मागणी सरपंच किशोर उईके, ग्रा.पं. सदस्य दिनेश मरस्कोल्हे, माजी सरपंच झनकलाल उईके, बेनीराम धुर्वे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)