शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नजर पैसेवारीत ८४४ गावे ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली. जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : १५ डिसेंबर रोजी घोषित होणाऱ्या अंतिम पैसेवारीकडे भात उत्पादकांचे लक्ष

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा$ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांना बसला असताना प्रशासनाने घोषित केलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील ८४४ गावे ५० पैशापेक्षा अधिक आहेत. सुरूवातीला अपुरा पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी आणि कीडींचे आक्रमण अशा अवस्थेत पैसेवारी अधिक घोषित झाल्याने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. ५० पेक्षा अधिक पैसेवारी असल्यास दुष्काटी मदतीची आशा मावळते.यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली.जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. सप्टेंबर झालेल्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. सध्या उच्च प्रतीच्या धानाला एका पाण्याची गरज आहे. गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व कीडींच्या प्रादूर्भावाने हातचे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.जिल्ह्यात ८९८ महसुली गावे आहेत. आता महसूल विभागाने सादर केलेल्या नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात ८४४ गावांची खरीप पिकांची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी ५० पैशापेक्षा अधीक दाखविली आहे.धान पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता असताना महसूल विभागाने मात्र सरसकट सातही तालुक्यातील पैसेवारीस ५० पुढे असल्याचे म्हटले आहे. महसूल विभागाचा सुधारित पैसेवारीला अहवाल ३० ऑक्टोबर रोजी येणार असून १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत शेतकरी दुष्काळाच्या स्थितीत असतानाही नजर आणेवारी ५० पेक्षा अधिक निघाल्याने शासनाकडून मदतीची आशा मावळत चालली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्यातरी कुणाचे लक्ष नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी