शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

नजर पैसेवारीत ८४४ गावे ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली. जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : १५ डिसेंबर रोजी घोषित होणाऱ्या अंतिम पैसेवारीकडे भात उत्पादकांचे लक्ष

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा$ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांना बसला असताना प्रशासनाने घोषित केलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील ८४४ गावे ५० पैशापेक्षा अधिक आहेत. सुरूवातीला अपुरा पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी आणि कीडींचे आक्रमण अशा अवस्थेत पैसेवारी अधिक घोषित झाल्याने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. ५० पेक्षा अधिक पैसेवारी असल्यास दुष्काटी मदतीची आशा मावळते.यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली.जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. सप्टेंबर झालेल्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. सध्या उच्च प्रतीच्या धानाला एका पाण्याची गरज आहे. गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व कीडींच्या प्रादूर्भावाने हातचे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.जिल्ह्यात ८९८ महसुली गावे आहेत. आता महसूल विभागाने सादर केलेल्या नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात ८४४ गावांची खरीप पिकांची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी ५० पैशापेक्षा अधीक दाखविली आहे.धान पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता असताना महसूल विभागाने मात्र सरसकट सातही तालुक्यातील पैसेवारीस ५० पुढे असल्याचे म्हटले आहे. महसूल विभागाचा सुधारित पैसेवारीला अहवाल ३० ऑक्टोबर रोजी येणार असून १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत शेतकरी दुष्काळाच्या स्थितीत असतानाही नजर आणेवारी ५० पेक्षा अधिक निघाल्याने शासनाकडून मदतीची आशा मावळत चालली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्यातरी कुणाचे लक्ष नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी