शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

८३ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 13, 2016 00:29 IST

मानवाच्या मुलभूत गरजांपैकी प्रमुख गरज असलेली बाब म्हणजे निवारा.

सर्वाधिक लाभार्थी तुमसर तालुक्यात : २०११ च्या जनगणनेचा आधारइंद्रपाल कटकवार भंडारामानवाच्या मुलभूत गरजांपैकी प्रमुख गरज असलेली बाब म्हणजे निवारा. परंतु भंडारा जिल्ह्यातील अजुनही ८३ हजार ३५२ लाभार्थी अजुनही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत सर्वांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला असला तरी जिल्ह्यात अजुनही घरकुलांचा प्रश्न कायम आहे. केंद्र शासनाने सन २०१६-१७ पासून इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे. सदर योजनेकरीता लाभार्थ्यांची निवडही सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या यादीनुसार होणार आहे. या योजनेसाठी संभाव्य पात्रता लाभार्थी यादी ही केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला पंचायत समितीमार्फत प्राप्त झालेली आहे. सदर यादी ग्रामसभेपुढे वाचन करून केंद्र शासनाने दिलेल्या १३ निकषानुसार पात्र लाभार्थ्यांचे निवड करावयाची होती. परंतु कुठे ग्रामसभेने हे निकष बाजूला ठेवून त्या यादीतील फक्त ज्यांना अगोदर घरकुलाचा लाभ मिळाला आहे किंवा जे मय्यत वा गावात राहत नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी अंतिम करून पंचायत समितीकडे पाठविल्याचे बोलल्या जात आहे. या योजनेबाबत नागरिकांकडून आक्षेप व हरकतीही मागविण्यात आल्या आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत यादीतील घरकुलांना मंजुरी व निवड यादीनुसार कुंटुबाचे आधार संलग्नीकरण करायचे आहे. तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियत्यांची निवड करण्यात येणार आहे. या यादीमध्ये सदर कुटूंबाचा समावेश तर झाला नाही ना, अशीही बाब समोर येत आहे. ग्रामसभेने अंतिम केलेल्या यादीची प्रत्यक्ष तपासणी करण्याची गरज आहे. जेणेकरून सदर कुटूंबाचे नाव त्या यादीतून वगळण्यात येवू शकतील. दुसरीकडे जे खरे लाभार्थी आहेत, अशांची नावे त्या यादीत समाविष्ट नसल्याचीही ओरड होत आहे. २६ अभियंत्यांची होणार नियुक्तीभंडारा जिल्ह्यातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तालुकानिहाय सात पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक एक अभियंता सदर काम करीत होते. मात्र कामाची व्याप्ती व २५० प्रस्तावामागे एक अभियंता यानुसार जिल्हाभरात कंत्राटी पद्धतीवर २६ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ही नियुक्ती आगामी दोन महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. तुमसर तालुका आघाडीवरकेंद्र शासनाने पंचायत समितीमार्फत तालुका निहाय पाठविलेल्या याद्यांमध्ये सर्वात जास्त लाभार्थी किंवा कच्च्या स्वरूपात घर असलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तुमसर तालुका आघाडीवर आहे. तुमसर तालुक्यात १८ हजार ५२ लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच भंडारा ११,९०३, लाखांदूर ९,७२०, लाखनी ९,७११, मोहाडी ९,४९६, पवनी ९,९९९, साकोली १४,४७० अशी लाभार्थ्यांची संख्या आहे. अल्पसंख्यक लाभार्थ्यांमध्ये सात कुटूंबाची नावे आहेत. यात भंडारा तालुक्यात तीन तर लाखनी तालुक्यात चार अल्पसंख्यकांना घरकुल देण्याचे प्रस्तावित आहे. मागील इंदिरा गांधी आवास योजनेत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना एक लक्ष रूपये दिले जात होते. या योजनेचे नामकरण करून लाभार्थ्यांना दीड लक्ष रूपये बांधकामासाठी दिले जाणार आहेत.सन २०२२ पर्यंत ८५ हजार ३५१ लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यावर्षी ४,८०० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ठ आहे. दोन आॅक्टोंबरपर्यंत ग्रामसभेपुढे प्राधान्यक्रम यादी करावयाची आहे. ३१ आॅक्टोंबरपर्यंत हरकती स्वीकारण्यात येतील. नवीन योजनेनुसार प्रत्येक घरकुल बांधकामासाठी दीड लक्ष रूपये मंजुर करण्यात येणार आहे. - जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.