शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्दे७८ शिबिरात २७ हजार नागरिक आश्रयाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुरानंतरच्या उपाययोजनांना प्रशासनाकडून गती देण्यात आली असून पूरग्रस्त गावात साथरोग पसरू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.

मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस जिल्ह्याला महापुराचा वेढा होता. आता महापूर ओसरला असून प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना पुराचा फटका बसला असून आठ हजार २५१ कुटुंब या महापुरात उद्ध्वस्त झाली. ३० बोटींसह १३० जवानांनी तीन दिवसात २७ हजार ३४७ नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढले. या सर्वांची व्यवस्था ७८ तात्पुरत्या शिबिरात करण्यात आली आहे.

महापुराने नदीतिरावरील अनेक शेतशिवार पाण्याखाली गेले होते. आता कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेल्याची माहिती आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावण्यात आले असून इतर सर्व रोहित्र आता सुरळीत सुरु झाले असून वीज पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. महापुरात वीज वितरण कंपनीला ३ कोटी २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.प्रशासनाकडून उपाययोजनापुराचे पाणी ओसरले असून पुरानंतरच्या उपाययोजनांना जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नुकसानीचे पंचनामे, घरातील गाळ काढणे, स्वच्छ पाणी पुरवठा, साथरोग पसरू नये म्हणून फवारणी तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरानंतरच्या उपाययोजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.उद्ध्वस्त घरे पाहून अश्रू अनावरवैनगंगेच्या कोपाने अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. तीन दिवसानंतर पूर उतरल्यानंतर पूरग्रस्त आपल्या घराचा अदमास घेत आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे पाहून पूरग्रस्तांना अश्रू अनावर होत आहेत. महापुरानंतर घरात काही बचावले काय याची चाचपणी घेत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भंडारा तालुक्यातील ३५ गावांना बसला आहे. या गावात आता उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल दिसत आहे.

टॅग्स :floodपूर