शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्दे७८ शिबिरात २७ हजार नागरिक आश्रयाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुरानंतरच्या उपाययोजनांना प्रशासनाकडून गती देण्यात आली असून पूरग्रस्त गावात साथरोग पसरू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.

मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस जिल्ह्याला महापुराचा वेढा होता. आता महापूर ओसरला असून प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना पुराचा फटका बसला असून आठ हजार २५१ कुटुंब या महापुरात उद्ध्वस्त झाली. ३० बोटींसह १३० जवानांनी तीन दिवसात २७ हजार ३४७ नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढले. या सर्वांची व्यवस्था ७८ तात्पुरत्या शिबिरात करण्यात आली आहे.

महापुराने नदीतिरावरील अनेक शेतशिवार पाण्याखाली गेले होते. आता कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेल्याची माहिती आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावण्यात आले असून इतर सर्व रोहित्र आता सुरळीत सुरु झाले असून वीज पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. महापुरात वीज वितरण कंपनीला ३ कोटी २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.प्रशासनाकडून उपाययोजनापुराचे पाणी ओसरले असून पुरानंतरच्या उपाययोजनांना जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नुकसानीचे पंचनामे, घरातील गाळ काढणे, स्वच्छ पाणी पुरवठा, साथरोग पसरू नये म्हणून फवारणी तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरानंतरच्या उपाययोजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.उद्ध्वस्त घरे पाहून अश्रू अनावरवैनगंगेच्या कोपाने अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. तीन दिवसानंतर पूर उतरल्यानंतर पूरग्रस्त आपल्या घराचा अदमास घेत आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे पाहून पूरग्रस्तांना अश्रू अनावर होत आहेत. महापुरानंतर घरात काही बचावले काय याची चाचपणी घेत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भंडारा तालुक्यातील ३५ गावांना बसला आहे. या गावात आता उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल दिसत आहे.

टॅग्स :floodपूर