शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 07:00 IST

वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्दे७८ शिबिरात २७ हजार नागरिक आश्रयाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुरानंतरच्या उपाययोजनांना प्रशासनाकडून गती देण्यात आली असून पूरग्रस्त गावात साथरोग पसरू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.

मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस जिल्ह्याला महापुराचा वेढा होता. आता महापूर ओसरला असून प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना पुराचा फटका बसला असून आठ हजार २५१ कुटुंब या महापुरात उद्ध्वस्त झाली. ३० बोटींसह १३० जवानांनी तीन दिवसात २७ हजार ३४७ नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढले. या सर्वांची व्यवस्था ७८ तात्पुरत्या शिबिरात करण्यात आली आहे.

महापुराने नदीतिरावरील अनेक शेतशिवार पाण्याखाली गेले होते. आता कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेल्याची माहिती आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावण्यात आले असून इतर सर्व रोहित्र आता सुरळीत सुरु झाले असून वीज पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. महापुरात वीज वितरण कंपनीला ३ कोटी २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.प्रशासनाकडून उपाययोजनापुराचे पाणी ओसरले असून पुरानंतरच्या उपाययोजनांना जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नुकसानीचे पंचनामे, घरातील गाळ काढणे, स्वच्छ पाणी पुरवठा, साथरोग पसरू नये म्हणून फवारणी तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरानंतरच्या उपाययोजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.उद्ध्वस्त घरे पाहून अश्रू अनावरवैनगंगेच्या कोपाने अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. तीन दिवसानंतर पूर उतरल्यानंतर पूरग्रस्त आपल्या घराचा अदमास घेत आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे पाहून पूरग्रस्तांना अश्रू अनावर होत आहेत. महापुरानंतर घरात काही बचावले काय याची चाचपणी घेत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भंडारा तालुक्यातील ३५ गावांना बसला आहे. या गावात आता उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल दिसत आहे.

टॅग्स :floodपूर