शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत जिल्ह्यात रस्ते अपघातात ७६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:51 IST

Bhandara : सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे

इंद्रपाल कटकवारभंडारा : महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेग आणि खराब स्थितीमुळे वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गत पाच वर्षात जिल्ह्यात २,०२२ रस्ते अपघातात एकूण ७६७ जणांचा बळी गेला आहे. अनेकदा जनजागृती करूनही रस्ते अपघातात कमी झालेली नाही. या अपघातांमध्ये २,१४३ लोक जखमी झाले आहेत.

२०२२ मध्ये सर्वाधिक ४७८ अपघातांची नोंद झाली आणि २०२० मध्ये सर्वांत कमी ३०८ अपघातांची नोंद झाली. २०२० मध्ये कोविडमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये घट झाली होती. पण यानंतर, २०२१ मध्ये अपघातांचा आकडा ७४ वरून ३८२ पर्यंत वाढला.

सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचेरस्ते अपघातात एक किंवा अधिक लोकांचा जागीच मृत्यू होतो तेव्हा त्याला 'प्राणघातक अपघात' म्हणतात. एकूण ७२२ अपघातांची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये ४७४, २०२३ मध्ये ४५४ आणि २०२४ मध्ये ४२६ जखमींची नोंद करण्यात आली. सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे झाले आहे.

२०२० मध्ये कमी तर २०२१ मध्ये सर्वाधिक जखमीजिल्हा वाहतूक विभागानुसार, गेल्या पाच वर्षांत, २०२२ मध्ये सर्वाधिक १७२ मृत्यू झाले. २०२० मध्ये १४५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्ये, हा आकडा १५२ वर पोहोचला. २०२३ मध्ये १५१ लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १४७ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये जखमींची संख्या सर्वाधिक ४२४ होती.

अपघातांचा आलेख वाढता२०२२ मध्ये ४७८ अपघात झाले, म्हणजे २६ ची वाढ झाली. तथापि, २०२३ मध्ये अपघातांचा आलेख ४१ वरून ४३७ वर आला. २०२४ मध्ये २० अपघातांची घट होत हा आकडा ४१७ वर आला.

"रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षात वाहतूक विभागाने १२ ठिकाणे निश्चित केली आहेत आणि वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. वाहनांचा वेग, सीट बेल्ट, हेल्मेट वापरणे नियम आहेत. मद्यपान करून गाडी चालविण्यास सक्त मनाई आहे. हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे."- जितेंद्र बोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक

टॅग्स :bhandara-acभंडाराAccidentअपघात