शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड होणार

By admin | Updated: June 11, 2016 00:33 IST

पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे.

विविध विभागांना उद्दिष्ट : सामाजिक वनीकरणाकडे रोपांची मागणी नोंदविण्याचे आवाहनभंडारा : पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बुधवारला झालेल्या बैठकीत सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.यासोबतच या कार्यक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असल्यामुळे स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट, निसर्गप्रेमी मंडळ आदींचा सहभाग घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाने दिलेल्या उद्दिष्टानुसार स्थळांची माहिती, गाव, स्थळनिहाय समन्वयकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, अक्षांश, रेखांश, जागेचा जी.पी.एस. प्रणालीने काढलेला फोटो, खोदण्यात आलेल्या खड्डयाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे.झाडे लावण्यासाठी प्रजातीनिहाय रोपांची मागणी सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी झाडे लावायची आहेत त्या ठिकाणी रोपे पोहचविण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावे. २५ ते २९ जून या कालावधीत वृक्षारोपण करावयाच्या ठिकाणी रोपे पोहचविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.वृक्ष लागवडीची सर्व माहिती शुक्रवारपर्यंत आॅनलाईन अपलोड करावी, अशा सूचना निंबाळकर यांनी दिले आहेत. यावेळी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.आर.प्रविण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, सामाजिक वनीकरण सहाय्यक संचालक एन.डब्लू. कावळे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) असे आहेत विभागनिहाय उद्दिष्ट१ जुलै रोजी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट याप्रमाणे, वनविभाग ७ लाख २३ हजार, सामाजिक वनीकरण १५ हजार, एफ.डी.सी.एम. १ हजार ७००, कृषी विभाग २० हजार, जिल्हा परिषद २५ हजार, आदिवासी आश्रम शाळा ३ हजार ५००, महसुल विभाग ५ हजार, आरोग्य विभाग ५ हजार, नगर परिषद आणि नगरपंचायत ८ हजार, पोलीस विभाग २ हजार, होमगार्ड ५ हजार, सिंचन विभाग १० हजार, सार्वजनिक बांधकाम २ हजार, अशोक लेलॅन्ड ५ हजार, मॉईल ५ हजार, सनफ्लॅग ५ हजार, कोब्रा बटालियन ५ हजार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जनता, विद्यार्थी, कर्मचारी, स्वयंसेवी संघटना यांच्या सहकार्याने किमान ५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.