शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्हा परिषदेचा ७५ टक्के निधी अखर्चित

By admin | Updated: March 18, 2015 00:44 IST

मार्च महिना संपायला केवळ १४ दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाकडे आजघडीस लाखो रूपये पडून आहेत.

प्रशांत देसाई भंडारामार्च महिना संपायला केवळ १४ दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाकडे आजघडीस लाखो रूपये पडून आहेत. या चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला शासकीय व सेस फंड मिळून कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी फेब्रुवारीअखेर केवळ २५ टक्के निधी खर्च झाला आहे. तब्बल ७५ टक्के निधी अद्याप अखर्चित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र, हा निधी खर्च करण्यास विभागप्रमुखांचाच निरूत्साह दिसून येतो. परिणामी, वर्षाच्या शेवटी घाईगडबडीत वेगवेगळ्या प्रकारची निविदा प्रक्रिया बनवली जाते. आणि शिल्लक निधी खर्च करण्याचा खटाटोप सुरू होतो. विशेष म्हणजे, यात गुणवत्ताप्राप्त कामे आणि चांगल्या साहित्याची खरेदीसुध्दा होत नाही. या प्रकारावर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सेस फंडासह शासनाच्या विविध कामांचा कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या खात्यात राहतो. या अनुषंगाने दरवर्षी मार्च अखेरीस अर्थसंकल्पीय तरतुदीसुध्दा केली जाते. मात्र, या तरतुदीनुसार प्राप्त निधीची विल्हेवाट लावताना अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. वारंवार सुचना, निर्देश देऊनही कुठल्याच प्रकारचे योजना विभाग प्रमुखांकडून केल्या जात नाही. परिणामी, वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याचा खटाटोप अधिकारी वर्गाकडून केल्या जात आहे. असाच काहीसा प्रकार यंदाही जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांकडून होत आहे. जिल्हा परिषदेत २०१४-२०१५ साठी मोठ्या प्रमाणात सेस फंड, शासकीय योजनांचा निधी आला. त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, अत्यल्प खर्च करून उर्वरित निधी शिल्लक ठेवण्यातच अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे. आता मार्च महिना उजाडून तो संपायला केवळ १४ दिवस शिल्लक आहे. या दिवसात जिल्हा परिषद वित्त विभागाला प्राप्त निधी खर्च करावयाचा आहे. तो खर्च न झाल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी, महिला व बाल कल्याण, शिक्षण, समाजकल्याण, बांधकाम या विभागातील लाभार्थ्यांना सवलत किंवा मोफत योजनेत वाटप करावयाचे साहित्य खरेदी झालेली नाही. साहित्य खरेदीचे सोपस्कार पार पडले असले तरी साहित्य खरेदी झाली नाही. वेळेत साहित्याची खरेदी झाली नाही तर जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी साहित्यापासून वंचित राहणार आहे.