शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

७५ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७४.८६ टक्के आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ डिसेंबरपर्यंत लसीकरणासाठी विशेष मोहीम म्हणून जिल्हाभर राबवण्यात  येत असलेल्या ‘मिशन लेफ्ट आउट’साठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आता दिसू लागली आहे. यात जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७४.८६ टक्के आहे.जिल्ह्याच्या लसीकरणासाठी ८ लाख  ९८ हजार ४०० एवढे उद्दिष्ट असून त्यापैकी ८ लाख ६७ हजार ९४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, ६ लाख  ७२ हजार ५०२ नागरिकांनी दुसरा डोस  घेतला आहे.  एकूण १६ लक्ष ४० हजार ४४४ डोस देण्यात आले आहेत. आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी गल्लीपासून मोठ्या मोहल्ला भागात जाऊन पाहणी केली. आजच्या लसीकरणामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेतल्याने शहरातील व जिल्ह्यातील नारी शक्ती कोरोनापासून संरक्षित झाली आहे.प्रामुख्याने शहरातील बचत गटाच्या महिलांना  आज शहर उपजीविका केंद्र मिस्किन टॅक येथील  कार्यक्रमात लसीकरण करण्यात आले. लसीकरण आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी यांनी माहिती दिली. त्यानंतर सफाई कामगार वस्ती, चांदणी चौक येथेही लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. मुस्लिमबहुल वस्ती, मोहल्ला भागात विशेषत: महिलांची बैठक घेतली. या बैठकीवेळी   मोबाइल लसीकरण व्हॅनसुद्धा होती, त्यामुळे तिथेच लसीकरण करण्यात  आले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या