शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

७३८ कोटींच्या भंडारा शहराच्या बायपास महामार्गाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 11:51 IST

भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.

ठळक मुद्देजमीन संपादनाची प्रक्रिया सुरू१४ किमीचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बायपास मार्गाला मंजुरी मिळाली असून हा बायपास १४ किमी. सहा पदरी राहणार आहे. रस्त्याचे बांधकाम, भुसंपादन व अन्य कामांसाठी ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जात असल्याने सर्व जड व प्रवासी वाहतूक याच मार्गावरून होते. जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालये याच मार्गावर आहेत. त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नागपूरहून निघालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्र.६) चार पदरी असला तरी मुजबी ते पलाडीपर्यंतचा रस्ता दोन पदरी असल्यामुळे शहरवासियांना त्याचा काहीच फायदा होत नव्हता. उलट अपघातात वाढ झाली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती.आता बायपासला मंजुरी मिळाली असून बांधकामाबाबत प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. प्रस्तावित मार्ग शहापूर, बेला वरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगा नदीवर दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सदर रस्ता गिरोला, भिलेवाडा मार्गाहून चारपदरी रस्त्याला येऊन मिळणार आहे. जमीन संपादनासाठी भारत सरकार तर्फे राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल.या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे.आर. जमिन १३ गावांमधून संपादीत करायची आहे. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.रस्ता सहापदरीकरणभंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.सदर बायपास रस्त्यामुळे नागरिकांना जड वाहतुकीची समस्या राहणार नाही. अपघाताचे प्रमाण कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपास रस्त्याची मागणी पूर्ण होणार आहे.-सुनील मेंढे,खासदार, भंडारा-गोंदिया.

टॅग्स :highwayमहामार्ग