शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

खरीप हंगामासाठी ७० हजार २१० मेट्रिक टन खत साठा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा ...

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे.

जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ८३ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून, एक लाख ९५ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे राहणार असून, २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धान, तर तूर पीक ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात महापूर, तुडतुडा रोगाने, अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे १ लाख १७ हजार ७०९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यात गतवर्षीचा २३ हजार ८१३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तर यावर्षी नव्याने मंजूर झालेला ७० हजार २१० मेट्रिक टन म्हणजेच एकूण ९४ हजार २३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र धारकांनी खताची विक्री पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत.

यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक उपलब्ध झाली आहेत.

जिल्ह्यात खरिपाच्या मशागत कामांना वेग आला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आढावा सभा तसेच खरिपातील विविध पिकांच्या नियोजनाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे एकही शेतकरी बियाणे अथवा खतापासून वंचित राहणार नाही, यासाठी आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

बॉक्स

कृषी केंद्रांना ऑनलाइन खते विक्री अनिवार्य

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन खतांच्या प्रिंटेड एमआरपीनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची विक्री करावी. याकरिता पॉस मशीनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्रांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्यात आले असून, ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे खते बियाणे देतानाच शेतकऱ्यांना याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी केंद्रांना सांगण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकरी सन्मान कक्षातून होणार तक्रारींचे निवारण

शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासोबतच खते, बियाण्यांबाबतची कोणतीही तक्रार तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समिती कृषी विभाग अथवा जिल्हा स्तरावरील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच त्यानुसार वरिष्ठांकडून चौकशी करीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोट

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७० हजार २१९ मेट्रिक टन मंजूर झाला आहे. याशिवाय २०२० - २१चा खतसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात कुठेही खताची टंचाई भासणार नाही. यासोबतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदुराव चव्हाण,

जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा