शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

खरीप हंगामासाठी ७० हजार २१० मेट्रिक टन खत साठा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा ...

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे.

जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ८३ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून, एक लाख ९५ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे राहणार असून, २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धान, तर तूर पीक ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात महापूर, तुडतुडा रोगाने, अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे १ लाख १७ हजार ७०९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यात गतवर्षीचा २३ हजार ८१३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तर यावर्षी नव्याने मंजूर झालेला ७० हजार २१० मेट्रिक टन म्हणजेच एकूण ९४ हजार २३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र धारकांनी खताची विक्री पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत.

यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक उपलब्ध झाली आहेत.

जिल्ह्यात खरिपाच्या मशागत कामांना वेग आला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आढावा सभा तसेच खरिपातील विविध पिकांच्या नियोजनाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे एकही शेतकरी बियाणे अथवा खतापासून वंचित राहणार नाही, यासाठी आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

बॉक्स

कृषी केंद्रांना ऑनलाइन खते विक्री अनिवार्य

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन खतांच्या प्रिंटेड एमआरपीनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची विक्री करावी. याकरिता पॉस मशीनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्रांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्यात आले असून, ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे खते बियाणे देतानाच शेतकऱ्यांना याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी केंद्रांना सांगण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकरी सन्मान कक्षातून होणार तक्रारींचे निवारण

शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासोबतच खते, बियाण्यांबाबतची कोणतीही तक्रार तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समिती कृषी विभाग अथवा जिल्हा स्तरावरील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच त्यानुसार वरिष्ठांकडून चौकशी करीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोट

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७० हजार २१९ मेट्रिक टन मंजूर झाला आहे. याशिवाय २०२० - २१चा खतसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात कुठेही खताची टंचाई भासणार नाही. यासोबतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदुराव चव्हाण,

जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा