शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

७० जोडपे अनुदानापासून वंचित

By admin | Updated: April 21, 2015 00:31 IST

पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.

शुभमंगल योजना अपयशी : अनेकांचे विवाह लग्न सोहळ्यातगोंदिया : पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना १० हजार तर विवाह घडवून आणणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यावर दोन हजार रूपये दिले जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ७० जोडप्यांना अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. परिणामी शुभमंगल योजना अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वर्षात शुभमंगल योजनेंतर्गत जिल्हयातील सहा संस्थांकडून करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील ८६ जोडप्यांना १० लाख ३२ हजार रूपये अनुदान देण्यात आले. परंतु ७० जोडप्यांना अजूनही कवडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेली जोडपी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लग्न लावून देणाऱ्या संस्था फक्त आपले अनुदान वाढविण्यासाठी वर-वधूंची संख्या वाढवितात. परंतु ते जोडपे निकष पुर्ण करीत नसल्याने अनुदानापासून वंचित राहतात. एकाच वर्षातील एवढे जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. मागील तीन वर्षाची संख्या पाहता शेकडोंच्या संख्येत जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांंना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात आहे. मागील तीन ते चार वर्षाच्या तुलनेत हा प्रकार गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेले जोडपे कागदपत्रांचीपुर्तता योग्यरित्या करीत नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आले नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना शुभमंगल कन्यादान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत. लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. (तालुका प्रतिनिधी)संघटनांमध्ये स्पर्धाआयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांची संख्या अधिक असावी यासाठी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्था प्रयत्न करतात. अनेक संस्था लोकप्रतिनिधींच्या हाताशी काम करणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे किंवा नेत्यांच्याच असल्यामुळे आपल्या संस्थेकडून अधिक जोडप्यांचा विवाह करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्वाधिक जोडप्यांचे लग्न आपण घडवून आणले असा वेगळा बाणा दाखविण्याचा शौक काही संघटनांना आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करण्यास आलेल्या जोडप्यांची शहानिशा न करता त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात उरकून टाकतात.